शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

मतदान केंद्रांत मोबाईल बंदी

By admin | Updated: April 21, 2015 00:04 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. ..

१०० मीटरपर्यंत प्रतिबंध : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जरोशन कडू तिवसाग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. मतदान केंद्रांवर प्रवेश करतेवेळी मतदारांना त्यांचे भ्रमणध्वनी बाहेरच ठेवावे लागणार आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटरच्या आत उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी प्रचार करीत आहे, असे निर्दशनास आल्यास त्याला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. मतदान केंद्राचे १०० मीटरच्या आत प्रचार करणे निवडणूक कायद्याने गुुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास वारंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. उमेदवाराचा निवडणूक मंडप केंद्रापासून २०० मीटरपलीकडे असेल. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात एखाद्या व्यक्तीकडून मतदानास अडथळा होईल, असा ध्वनीक्षेपक लावण्यात आला असेल तर मतदान केंद्राध्यक्ष तो बंद करु शकतो. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची छायाचित्रे छायाचित्रकाराला घेता येईल. मतदार नसलेल्या कुठल्याही व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी मिळू शकत नाही. मतदारांना ने-आण करणाऱ्या वाहनांवर नजरमतदारांची ने-आण करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आयोगाची करडी नजर राहणार आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्याचवेळी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अन्वये १३३ अंतर्गत उमेदवारा- विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मतदार केंद्राच्या आत शस्त्र नेल्यास दोन वर्षे कारावास व दंडाची तरतूद केली आहे. आक्षेपित मतांकरिता दोन रुपये शुल्कमतदार यादीत नाव असताना मतदान प्रतिनिधीने मतदारावर आक्षेप घेतल्यास त्या आक्षेपासाठी दोन रुपये केंद्राध्यक्षाकडे जमा करावे लागणार आहे. चौकशीअंती आक्षेप सिध्द न झाल्यास अमानत रक्कम जमा केली जाणार आहे. कडेवर मूल असलेल्या महिलांना प्राधान्यमतदान केंद्रावर महिला, पुरुष व मतदारांच्या स्वतंत्र रांगा राहतील.अपंग व कडेवर मूल असलेल्या महिला मतदारांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. मुकबधीर मतदारांसमवेत इतर प्रतिनिधींना पाठवू नये, असे आदेश आयोगांनी दिले आहेत. केंद्राध्यक्ष, प्रतिनिधींना घ्यावी लागणार शपथलोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२८ मधील तरतुदीनुसार मतदानाची गुप्तता राखण्यासाठी तरतूद असल्याने संबंधित प्रतिज्ञापत्राचे वाचन करुन मतदान अधिकारी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांना शपथ द्यावी लागणार आहे. प्रत्येक केवळ एकच प्रतिनिधी केंद्राच्या आत राहणार आहे.