शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

महाराष्ट्राच्या जन्मस्थानीच मनरेगा मृतावस्थेला; केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला काम

By गणेश वासनिक | Updated: October 26, 2023 17:08 IST

महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

अमरावती - देशाला दिशा देणारी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेत १ कोटी ३० लक्ष जॉबधारक मजूर आहेत. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे यंत्रणा रोहयो कामे घेण्यास धजावत नसल्याने गत तीन वर्षांमध्ये राज्यात केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे सदर योजना मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

१९७६ च्या भयंकर दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना कायद्याच्या चौकटीत बसवून सर्व विभागांना ग्रामीण मजुरांना अधिकाधिक रोजगार देण्यासाठी बांधिलकी घातलेली आहे. राज्य शासनाने निर्माण केलेली सदर योजना केंद्राने राबविण्यास सुरुवात केली. बिहार राज्यात या योजनेमुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात हाताला कामे मिळाली आहेत. महाराष्ट्रात मनरेगाची घसरण झाल्यामुळे शासनाने मिशन हाती घेत क्षमता बांधणी कक्ष निर्मित करताना मनरेगाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याचे ठरविले आहेत. लोकाभिमुख करण्यासाठी या योजनेतून गावविकास, नवनिर्माण, शेती फलोत्मादने, कुक्कुटपालन, वृक्षलागवड, फळबाग योजना यामध्ये समाविष्ट केलेली आहे. असे असले तरी अनेक योजना राबविण्यात शासकीय यंत्रणेला रस नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

कृती आराखड्याची सक्तीमनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात सन २०२५ मध्ये विविध योजना राबविण्याची सक्ती करताना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्याना दिलेले आहेत. योजना राबविताना राज्यात १० लक्ष सिंचन विहिरी, ७ लक्ष, शेततळी, १० लक्ष हेक्टवर बांबू क्षेत्र व फुलबाग, रेशीम उद्योग,जलतारा शेळीपालन घेण्यासाठी सक्ती केलेली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, पंचवार्षिक बजेट तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.