शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

महाराष्ट्राच्या जन्मस्थानीच मनरेगा मृतावस्थेला; केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला काम

By गणेश वासनिक | Updated: October 26, 2023 17:08 IST

महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

अमरावती - देशाला दिशा देणारी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेत १ कोटी ३० लक्ष जॉबधारक मजूर आहेत. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे यंत्रणा रोहयो कामे घेण्यास धजावत नसल्याने गत तीन वर्षांमध्ये राज्यात केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे सदर योजना मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

१९७६ च्या भयंकर दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना कायद्याच्या चौकटीत बसवून सर्व विभागांना ग्रामीण मजुरांना अधिकाधिक रोजगार देण्यासाठी बांधिलकी घातलेली आहे. राज्य शासनाने निर्माण केलेली सदर योजना केंद्राने राबविण्यास सुरुवात केली. बिहार राज्यात या योजनेमुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात हाताला कामे मिळाली आहेत. महाराष्ट्रात मनरेगाची घसरण झाल्यामुळे शासनाने मिशन हाती घेत क्षमता बांधणी कक्ष निर्मित करताना मनरेगाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याचे ठरविले आहेत. लोकाभिमुख करण्यासाठी या योजनेतून गावविकास, नवनिर्माण, शेती फलोत्मादने, कुक्कुटपालन, वृक्षलागवड, फळबाग योजना यामध्ये समाविष्ट केलेली आहे. असे असले तरी अनेक योजना राबविण्यात शासकीय यंत्रणेला रस नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

कृती आराखड्याची सक्तीमनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात सन २०२५ मध्ये विविध योजना राबविण्याची सक्ती करताना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्याना दिलेले आहेत. योजना राबविताना राज्यात १० लक्ष सिंचन विहिरी, ७ लक्ष, शेततळी, १० लक्ष हेक्टवर बांबू क्षेत्र व फुलबाग, रेशीम उद्योग,जलतारा शेळीपालन घेण्यासाठी सक्ती केलेली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, पंचवार्षिक बजेट तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.