शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

महाराष्ट्राच्या जन्मस्थानीच मनरेगा मृतावस्थेला; केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला काम

By गणेश वासनिक | Updated: October 26, 2023 17:08 IST

महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

अमरावती - देशाला दिशा देणारी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेत १ कोटी ३० लक्ष जॉबधारक मजूर आहेत. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे यंत्रणा रोहयो कामे घेण्यास धजावत नसल्याने गत तीन वर्षांमध्ये राज्यात केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे सदर योजना मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

१९७६ च्या भयंकर दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना कायद्याच्या चौकटीत बसवून सर्व विभागांना ग्रामीण मजुरांना अधिकाधिक रोजगार देण्यासाठी बांधिलकी घातलेली आहे. राज्य शासनाने निर्माण केलेली सदर योजना केंद्राने राबविण्यास सुरुवात केली. बिहार राज्यात या योजनेमुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात हाताला कामे मिळाली आहेत. महाराष्ट्रात मनरेगाची घसरण झाल्यामुळे शासनाने मिशन हाती घेत क्षमता बांधणी कक्ष निर्मित करताना मनरेगाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याचे ठरविले आहेत. लोकाभिमुख करण्यासाठी या योजनेतून गावविकास, नवनिर्माण, शेती फलोत्मादने, कुक्कुटपालन, वृक्षलागवड, फळबाग योजना यामध्ये समाविष्ट केलेली आहे. असे असले तरी अनेक योजना राबविण्यात शासकीय यंत्रणेला रस नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे.

कृती आराखड्याची सक्तीमनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात सन २०२५ मध्ये विविध योजना राबविण्याची सक्ती करताना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्याना दिलेले आहेत. योजना राबविताना राज्यात १० लक्ष सिंचन विहिरी, ७ लक्ष, शेततळी, १० लक्ष हेक्टवर बांबू क्षेत्र व फुलबाग, रेशीम उद्योग,जलतारा शेळीपालन घेण्यासाठी सक्ती केलेली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, पंचवार्षिक बजेट तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.