शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या एमबीए विभागातून शैक्षणिक कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाली आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. निकालदेखील ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाली आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. निकालदेखील रोखण्यात आले. याबाबत निवेदन, तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. केवळ समिती गठित झाली आणि अहवाल अप्राप्त आहे, असे टिपिकल उत्तर दिले जाते, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला आहे.

एमबीए विभागाचा कारभार ढासळल्यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांना युवक काँग्रेसने शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुराव्यानिशी सांगितले आहे. मात्र, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी केवळ वरिष्ठ कर्तव्य बजावत असल्याचा आक्षेप युवक काँग्रेसने घेतला आहे. एमबीए विभागातून सन २०१८-२०१९ मध्ये प्रवेशित १० विद्यार्थ्यांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाले आहेत. यात ४ विद्यार्थ्यांचे पदविका गुणपत्रिका, ५ विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्र आणि एका विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्राचा समावेश आहे. असे असताना मूळ कागदपत्रे न देता ९ विद्यार्थ्यांना दुय्यम कागदपत्रे देण्याचा प्रताप विद्यापीठाने केला आहे. याप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने सुरू असताना केवळ समिती गठित असून, अहवाल अप्राप्त असल्याची सांगण्यात येते. ४ विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवले आहे. एमबीए विभागप्रमुखांचे प्रवेश, निकालाकडे लक्ष नाही. परीक्षांमध्ये सावळागोंधळ सुरु आहे. एमबीए विभागप्रमुख दीपक चाचरकर हे विद्यार्थ्यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्र आणतात, असा आरोप सागर देशमुख यांनी केला. कोरोना काळात परीक्षा घेण्यात आल्या असताना एमबीए विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत. पत्रपरिषदेत ऋषिकेश वासनकर, हेमा शर्मा, सुमित गणोरकर, केतकी पाटील आदी उपस्थित होते.

---------

आधी प्रवेश दिला नंतर रद्द केला

सन २०१९-२०२० या वर्षात एमबीए विभागाने हेमा शरद शर्मा या विद्यार्थिनीला समितीने प्रवेश दिला आणि नंतर प्रवेश नाकारला गेला. बी.कॉम अंतिम वर्षाचा निकाल जाहीर व्हायचा होता. त्यामुळे समितीने गुणपत्रिका आणून देईन, असे हेमा शर्मा हिच्याकडून लिहून घेतले. त्यानुसार शर्मा यांनी निकाल लागताच गुणपत्रिका आणून दिली. एमबीए भाग १ चा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश दिल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, अचानक शर्मा यांना घरी पत्र पाठवून प्रवेश रद्द झाल्याचे कळविण्यात आले. याबाबत चौकशी समिती गठित करून पाच दिवसांत न्याय मिळेल, असे कुलगुरूंनी सांगितले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी कारवाई झालीच नाही, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

------------------

एमबीए विभागाच्या कारभाराबाबत गठित समितीचे एक सदस्य कोरोनाग्रस्त आहे. त्यामुळे अहवाल अप्राप्त असून, समितीची एक बैठक व्हायची आहे. अहवाल मिळाल्यानंतर कार्यवाहीची रुपरेषा निश्चित होईल.

- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ