शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मिनी मंत्रालयाची स्वायत्तता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:53 IST

आॅनलाईन बदली, भरती प्रक्रियेमुळे झेडपींची स्वायत्तता धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. केवळ ठराव घेणे व शासनाकडे पाठविणे एवढेच काम जि.प. पदाधिकारी, सदस्यांना उरले आहेत.

ठळक मुद्देअधिकारांवर गदा : पदाधिकाºयांची खंत; भरती, बदली शासनस्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅनलाईन बदली, भरती प्रक्रियेमुळे झेडपींची स्वायत्तता धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. केवळ ठराव घेणे व शासनाकडे पाठविणे एवढेच काम जि.प. पदाधिकारी, सदस्यांना उरले आहेत.पंचायतराज व्यवस्थेत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यात आल्या. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची भूमिका निश्चित करण्यात आली. याच जिल्हा परिषदांमधून अनेक आमदार, खासदार मंत्री घडलेत. पूर्वी जिल्हा परिषदेला प्रशासकीय अधिकारी असल्याने हे शक्य झाले. मात्र आता जिल्हा परिषदेचे अधिकारच गोठविले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी पदाधिकारी आणि सदस्य केवळ नावापुरतेच उरले काय, असा समज बळावत आहे. आतापर्यंत कर्मचाºयांच्या बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेकडे होते. तृतीय श्रेणी कर्मचाºयांची पदभरती होत होती. पदाधिकारी, सदस्यांकडे कर्मचाºयांची रीघ लागत होती. सदस्यांना आपल्या मतदारसंघात चांगला कर्मचारी नेमण्याची संधी मिळत होती. मात्र आता बदली प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यच काय पदाधिकाºयांनाही आपल्या मर्जीने मतदारसंघात चांगला कर्मचारी नेणे कठीण झाले आहे. आॅनलाईन जागा व तेथे नियुक्त कर्मचाºयाला स्वीकारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पदभरतीची प्रक्रिया थेट मंत्रालयस्तरावर राबविली जाते. सचिव दर्जाचा अधिकारी यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचायत राज मूल्यमापन समितीच्या अहवालानुसार ग्रामविकास विभागाने सन २००० मध्ये एक अध्यादेश काढला. योजना हस्तांतरित झाल्या मात्र त्या केवळ कागदोपत्रीच जिल्हा परिषदेकडे आहे. एकंदरित शासन पातळीवरून केले जाणारे बदल हे जिल्हा परिषदेतील अधिकार गोठविण्याचेच प्रयत्न असल्याच्या भावना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती संजय देशमुख, बळवंत वानखडे आदींनी व्यक्त केल्यात.