शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लाखो प्रकल्पग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:11 IST

विदर्भातील २५ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी आतापर्यंत सातवेळा आंदोलने केलीत. मात्र, अद्याप प्रश्न निकाली न निघाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, मार्गदर्शक साहेबराव विधळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयुती सरकारवर रोष : विदर्भ प्रकल्पग्रस्त कृती समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील २५ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी आतापर्यंत सातवेळा आंदोलने केलीत. मात्र, अद्याप प्रश्न निकाली न निघाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, मार्गदर्शक साहेबराव विधळे यांनी पत्रपरिषदेत दिली.शासनाने सन २००८ पासून सिंचन मध्यम व लघु प्रकल्प निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या. यामध्ये एकाच धरणाकरिता भूसंपादन प्रक्रियेत खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला प्रत्येक शेतकºयाला वेगवेगळ्या दराने देण्यात आला.यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून लढा उभारला असता वारंवार शासनाच्या भूलथापांना बळी पडावे लागत आहे. मागील महिन्यात चार दिवस चाललेल्या जिल्हाकचेरीवरील आंदोलनात मध्यस्थी करून तोडगा निघेल, असे आश्वासन दिले गेले. मुंबईत २० फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली. पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रेटला. मात्र सदर प्रश्न संसदेत मांडल्यानंतरच त्यावर तोडगा निघू शकेल, असे समजल्याने खासदार आनंदराव अडसूळ यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. पुन्हा २६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून तोडगा निघेल, असे आश्वासन ना.गिरीश महाजन यांनी दिले. मात्र, अद्यापही निर्णयाची प्रतीक्षाच प्रकल्पग्रस्तांना करावी लागत आहे. यावर ठोस पर्याय म्हणून आता विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.