शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

लाखो प्रकल्पग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:11 IST

विदर्भातील २५ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी आतापर्यंत सातवेळा आंदोलने केलीत. मात्र, अद्याप प्रश्न निकाली न निघाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, मार्गदर्शक साहेबराव विधळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयुती सरकारवर रोष : विदर्भ प्रकल्पग्रस्त कृती समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील २५ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी आतापर्यंत सातवेळा आंदोलने केलीत. मात्र, अद्याप प्रश्न निकाली न निघाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण, मार्गदर्शक साहेबराव विधळे यांनी पत्रपरिषदेत दिली.शासनाने सन २००८ पासून सिंचन मध्यम व लघु प्रकल्प निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या. यामध्ये एकाच धरणाकरिता भूसंपादन प्रक्रियेत खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला प्रत्येक शेतकºयाला वेगवेगळ्या दराने देण्यात आला.यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून लढा उभारला असता वारंवार शासनाच्या भूलथापांना बळी पडावे लागत आहे. मागील महिन्यात चार दिवस चाललेल्या जिल्हाकचेरीवरील आंदोलनात मध्यस्थी करून तोडगा निघेल, असे आश्वासन दिले गेले. मुंबईत २० फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली. पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रेटला. मात्र सदर प्रश्न संसदेत मांडल्यानंतरच त्यावर तोडगा निघू शकेल, असे समजल्याने खासदार आनंदराव अडसूळ यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. पुन्हा २६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून तोडगा निघेल, असे आश्वासन ना.गिरीश महाजन यांनी दिले. मात्र, अद्यापही निर्णयाची प्रतीक्षाच प्रकल्पग्रस्तांना करावी लागत आहे. यावर ठोस पर्याय म्हणून आता विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.