शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. ...

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे आधीच महागाईने त्रस्त नागरिकांना मिठाईच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

डेअरीमधून गाईच्या दुधाची ४० ते ४२ रुपये तर म्हशीच्या दुधाची ६० रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. साखरेची किरकोळ बाजारात ४० ते ४२ आणि घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी दुधाचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मिठाई विक्रेत्यांकडून ५० ते ५५ रुपये लिटर दराने काठियावाडी व अन्य दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केली जाते. उत्पादकांना स्वीट मार्ट चालकांकडून कवडीमोल भाव दिला जात असताना मिठाईची मात्र चढ्या दरात विक्री केली जात आहे. सणासुदीत आवश्यक म्हणून ग्राहकांना भाव वाढले असतानादेखील निमूटपणे मिठाई खरेदी करावी लागत आहे. स्वीट मार्टचालकांकडून खवा पेढ्याची ३६० रुपये प्रतिकिलो, केशर पेढा ४०० रुपये प्रतिकिलो, काजूकतली ८०० रुपये प्रतिकिलो, मलाई पेढा ३६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पेढ्याच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा दिवाळी आदी महत्त्वपूर्ण सण आहेत. मिठाईचे दर असेच राहणार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.

बॉक्स

का दर वाढले?

मागील काही दिवसांपासून दूध आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध ५० ते ६० रुपये, तर साखर ४२ ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. दुसरीकडे मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ केली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बेसन आणि डाळींच्या दरात वाढ झाली असून साखरेच्या भावातही मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची खरेदी करावी लागत आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बॉक्स

ग्राहक म्हणतात...

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली असतानाच सणासुदीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. मात्र, सणोत्सवाच्या काळात प्रसादासाठी खरेदी करावीच लागतात.

- कोमल बांबोडे, अमरावती

सणासुदीच्या काळात मिठाई व अन्य खाद्यपदार्थांत भेसळीची अधिक शक्यता असते. याकरिता मिठाई खरेदी करण्याऐवजी खरीच उकडीचे मोदक, मोतीचूर लाडू व अन्य मिष्टान्न तयार करण्यावर भर असतो.

- मुन्ना जोशी, अमरावती

बॉक्स

भेसळीकडे लक्ष असू द्या

- दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात.

- शुद्ध तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे. बेसण पिठात लाखी या विषारी डाळीचे पीठ मिसळले जाते.

- दुधामध्ये युरिया हे खत मिसळण्यात येते. पनीरमध्येही स्टार्च मिसळला जातो. तर तुपामध्ये शिजविलेल्या बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर मिसळला जातो.

****