शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. ...

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे आधीच महागाईने त्रस्त नागरिकांना मिठाईच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

डेअरीमधून गाईच्या दुधाची ४० ते ४२ रुपये तर म्हशीच्या दुधाची ६० रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. साखरेची किरकोळ बाजारात ४० ते ४२ आणि घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी दुधाचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मिठाई विक्रेत्यांकडून ५० ते ५५ रुपये लिटर दराने काठियावाडी व अन्य दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केली जाते. उत्पादकांना स्वीट मार्ट चालकांकडून कवडीमोल भाव दिला जात असताना मिठाईची मात्र चढ्या दरात विक्री केली जात आहे. सणासुदीत आवश्यक म्हणून ग्राहकांना भाव वाढले असतानादेखील निमूटपणे मिठाई खरेदी करावी लागत आहे. स्वीट मार्टचालकांकडून खवा पेढ्याची ३६० रुपये प्रतिकिलो, केशर पेढा ४०० रुपये प्रतिकिलो, काजूकतली ८०० रुपये प्रतिकिलो, मलाई पेढा ३६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पेढ्याच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा दिवाळी आदी महत्त्वपूर्ण सण आहेत. मिठाईचे दर असेच राहणार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.

बॉक्स

का दर वाढले?

मागील काही दिवसांपासून दूध आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध ५० ते ६० रुपये, तर साखर ४२ ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. दुसरीकडे मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ केली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बेसन आणि डाळींच्या दरात वाढ झाली असून साखरेच्या भावातही मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची खरेदी करावी लागत आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बॉक्स

ग्राहक म्हणतात...

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली असतानाच सणासुदीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. मात्र, सणोत्सवाच्या काळात प्रसादासाठी खरेदी करावीच लागतात.

- कोमल बांबोडे, अमरावती

सणासुदीच्या काळात मिठाई व अन्य खाद्यपदार्थांत भेसळीची अधिक शक्यता असते. याकरिता मिठाई खरेदी करण्याऐवजी खरीच उकडीचे मोदक, मोतीचूर लाडू व अन्य मिष्टान्न तयार करण्यावर भर असतो.

- मुन्ना जोशी, अमरावती

बॉक्स

भेसळीकडे लक्ष असू द्या

- दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात.

- शुद्ध तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे. बेसण पिठात लाखी या विषारी डाळीचे पीठ मिसळले जाते.

- दुधामध्ये युरिया हे खत मिसळण्यात येते. पनीरमध्येही स्टार्च मिसळला जातो. तर तुपामध्ये शिजविलेल्या बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर मिसळला जातो.

****