शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

४४५ कुटुंबांचे स्थलांतरण अडले

By admin | Updated: March 7, 2016 00:01 IST

निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे.

निम्नवर्धा प्रकल्प : नऊ गावांचे पुनर्वसनअमरावती : निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे. नागरी सुविधांची कामे झाली नसल्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. २० वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यातील अनेक गावे निम्नवर्धा प्रकल्पाने बाधित झाली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी, येरली, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर, बऱ्हाणपूर, धारवाडा, दुर्गवाडा आणि पिंपळखुटा ही गावे बुडित क्षेत्रात असल्याने या गावांचे पुनर्वसन स्थळ निश्चित आहे. यापैकी वरुड बगाजी, मंगरुळ दस्तगीर, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर आणि बऱ्हाणपूर या ६ गावातील कुटुंब पुनर्वसनस्थळी स्थलांतरित झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे. साधारणत: १९९५ पासून या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. निम्नवर्धा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ९ गावातील १६४४ कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली. त्यापैकी ६ गावांतील ११९९ कुटुंब पुनर्वसनग्रामात स्थलांतरीत झाली. मात्र, उर्वरित ३ गावांतील ४४५ कुटुंबांना पुनर्वसनाची आस लागली आहे. ९ गावातील कुटुंबांसाठी पुनर्वसित गावांत १७०० भूखंड पाडण्यात आले. पैकी १३५८ भूखंडांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ३४२ भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. पिंपळखुट्याच्या विद्युतीकरणाला मुहूर्तच नाहीनिम्नवर्धा प्रकल्पात पिंपळखुटा गाव अंशत: बुडीत क्षेत्रात आहे. येथील २४ कुटुंबांचे स्थलांतरण गाव क्षेत्रातील आहे. त्यासाठी ४८ भूखंड पाडण्यात आलेत. त्यापैकी १५ भूखंडांचे वाटप करण्यात आलेत. नागरी सुविधांची कामे सुरू असले तरी कुर्मगती आहे. येथे बाह्यविद्युतीकरण रखडले आहे. हे काम करण्यास विदर्भ जलविद्युत मंडळ, नागपूरला अद्याप मुहूर्त गवसलेला नाही. नागरी सुविधा ३० टक्क्यांवरच दुर्गवाडा येथील २१८ कुटुंबांसाठी आलवाडा येथे २३८ भूखंड पाडण्यात आले. मात्र, वितरण रखडले आहे. नागरी सुविधांच्या कामाचे घोडे ३० टक्क्यांवर अडले आहे. सुविधा नसल्याने कुटुंबांचे स्थलांतरण आणि भूखंड वाटपही होऊ शकले नाही. विशेष म्हणजे बुडित क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहारावर शासनाकडून टाच आल्याने बाधितांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. घोडे कुठे अडले ?निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ९ पैकी ३ गावातील कुटुंबांचे स्थलांतरण योग्य पुनर्वसनाअभावीच रखडले आहे. धारवाडा येथील २०३ कुटुंबांचे पुनर्वसन गावानजीकच आहे. मात्र, पुनर्वसन स्थळावर बसस्थानक, स्मशानभूमी, रोड, बाजार ओटे, हॅन्डपंप, बांधकाम विहीर व नळयोजनांचे काम कुर्मगतीने सुरू आहे. २०३ पैकी १४५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आह. भूखंड वाटप रखडल्याने प्रकल्पग्रस्तांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे.