शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

४४५ कुटुंबांचे स्थलांतरण अडले

By admin | Updated: March 7, 2016 00:01 IST

निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे.

निम्नवर्धा प्रकल्प : नऊ गावांचे पुनर्वसनअमरावती : निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे. नागरी सुविधांची कामे झाली नसल्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. २० वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यातील अनेक गावे निम्नवर्धा प्रकल्पाने बाधित झाली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी, येरली, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर, बऱ्हाणपूर, धारवाडा, दुर्गवाडा आणि पिंपळखुटा ही गावे बुडित क्षेत्रात असल्याने या गावांचे पुनर्वसन स्थळ निश्चित आहे. यापैकी वरुड बगाजी, मंगरुळ दस्तगीर, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर आणि बऱ्हाणपूर या ६ गावातील कुटुंब पुनर्वसनस्थळी स्थलांतरित झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे. साधारणत: १९९५ पासून या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. निम्नवर्धा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ९ गावातील १६४४ कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली. त्यापैकी ६ गावांतील ११९९ कुटुंब पुनर्वसनग्रामात स्थलांतरीत झाली. मात्र, उर्वरित ३ गावांतील ४४५ कुटुंबांना पुनर्वसनाची आस लागली आहे. ९ गावातील कुटुंबांसाठी पुनर्वसित गावांत १७०० भूखंड पाडण्यात आले. पैकी १३५८ भूखंडांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ३४२ भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. पिंपळखुट्याच्या विद्युतीकरणाला मुहूर्तच नाहीनिम्नवर्धा प्रकल्पात पिंपळखुटा गाव अंशत: बुडीत क्षेत्रात आहे. येथील २४ कुटुंबांचे स्थलांतरण गाव क्षेत्रातील आहे. त्यासाठी ४८ भूखंड पाडण्यात आलेत. त्यापैकी १५ भूखंडांचे वाटप करण्यात आलेत. नागरी सुविधांची कामे सुरू असले तरी कुर्मगती आहे. येथे बाह्यविद्युतीकरण रखडले आहे. हे काम करण्यास विदर्भ जलविद्युत मंडळ, नागपूरला अद्याप मुहूर्त गवसलेला नाही. नागरी सुविधा ३० टक्क्यांवरच दुर्गवाडा येथील २१८ कुटुंबांसाठी आलवाडा येथे २३८ भूखंड पाडण्यात आले. मात्र, वितरण रखडले आहे. नागरी सुविधांच्या कामाचे घोडे ३० टक्क्यांवर अडले आहे. सुविधा नसल्याने कुटुंबांचे स्थलांतरण आणि भूखंड वाटपही होऊ शकले नाही. विशेष म्हणजे बुडित क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहारावर शासनाकडून टाच आल्याने बाधितांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. घोडे कुठे अडले ?निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ९ पैकी ३ गावातील कुटुंबांचे स्थलांतरण योग्य पुनर्वसनाअभावीच रखडले आहे. धारवाडा येथील २०३ कुटुंबांचे पुनर्वसन गावानजीकच आहे. मात्र, पुनर्वसन स्थळावर बसस्थानक, स्मशानभूमी, रोड, बाजार ओटे, हॅन्डपंप, बांधकाम विहीर व नळयोजनांचे काम कुर्मगतीने सुरू आहे. २०३ पैकी १४५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आह. भूखंड वाटप रखडल्याने प्रकल्पग्रस्तांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे.