शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

मेळघाटात ४१ गावांतील मजुरांचे स्थलांतर

By admin | Updated: December 8, 2015 00:13 IST

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

अत्यल्प पावसाचा परिणाम : पोटाची खळगी भरण्यासाठीअमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दऱ्या-खोऱ्यात शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळी आली आहे. मेळघाटात रोजगारासाठी कुठलेही मोठे उद्योग नसल्यामुळे येथील मजुरांचे जीवनमान शेती व किरकोळ व्यवसायावर अवलंबून असतात. मात्र पावसाअभावी शेतीही फुलवू शकले नाही. त्यामुळे किरकोळ व्यवसायही धोक्यात आले असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी तालुक्यातील अंबापाटी, गिरगुटी, खोंगाडा, जामली (आर), कुलागण खुर्द, वस्तापूर, बदनापूर, धरमडोह, बहदारपूर, सप्ती, रोही फाटा, टेंबू्रसोडा, चांदपूर, जैतादेही, भुलेरी, लवदा वन, भवई, ढोमणी फाटा, तेलखार येथील मजूर आपल्या कुटुंबांसह इतरत्र स्थलांतरित झाल्याचा अहवाल आहे. रामटेक, ढोमणबर्डा, मेनघाट, भांदरी, बोरेटयाखेडा, बारुगव्हाण, बोदू, लाखेवाडा, चोबेदा, आवागड, घना, खडीमल, चुनखडी, माडीझडप, बिच्छुखेडा, नवलगाव, गंगारखेडा, कोटमी, पलशा, जरिदा, मेहरीयाम आदी गावांत रोजगारच नसल्याचे पुढे आले आहे. खोज संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी शासनाला पत्र पाठवून येथे रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दखल घ्यावी, अशी येथील मजुरांची मागणी आहे. (प्रतिनिधी)