शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

ग्रीन रॅलीतून पर्यावरण संवर्धनचा संदेश

By admin | Updated: January 11, 2016 00:11 IST

भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरण, वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती : दीड हजारांवर विद्यार्थी सहभागीअमरावती : भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जपान येथील मारुहाची टेन्थ कार्पोरेशनचे सीईओे हिताशी सातो, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. आधुनिक युगात वाढणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाची गरज आहे. त्यादृष्ट्रीने श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मिशन आॅलिम्पिक, जपान येथील के-१३६, सामाजिक वनीकरण यानी संयुक्तारित्या ग्रीन रॅलीचे आयोजन केले. रविवारी सकाळी ८.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत सायकलवर जपानचे इसाम कियामा, ताजीमा कोशिओ, जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत, डेनमार्कचे फिन बेडग्रन, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भीमराव खंडाते, गणेश मालटे, प्रायार्च स्मिता देशमुख, नगरसेविका नीलिमा काळे, सुजाता सभानेसह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रात भाऊसाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करून रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी पंचवटी चौकात पर्यावरणाविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. पंचवटी चौकातून निघालेली रॅली गर्ल्स हायस्कूल चौक, मालटेकडी, राजकमल चौक, राजापेठ मार्गे परत इर्विन चौक येथून श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात नेण्यात आली. त्या ठिकाणी रॅलीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसुळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून ग्रिन रॅलीच्या आयोजनाबाबत आयोजकांचे कौतुक केले. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय वायू सेनेतून निवृत्त झालेले दीपक आत्राम, के-१३६ चे इंडिया हेड शशांक वाडेकर, संयोजक चेतन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रॅलीचे व्यवस्थापनाची जबाबदारी स्काऊटच्या ५२ विद्यार्थ्यांनी सांभाळली. त्यामध्ये टिम प्रमुख प्रतीक कुऱ्हेकर यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्तविक चेतन राऊत, संचालक निकिता सेवक व अनिरुध्द महाजन तर आभार प्राचार्य स्मिता देशमुख यांनी केले. (प्रतिनिधी)अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादग्रीन रॅली शहरातील विविध मार्गांवरून जात असताना अमरावतीकरांसाठी लक्षवेधी बनली होती. रॅलीत सहभागी असणाऱ्या सायकलस्वारांना मार्गावरील हातवारे करून चांगल्या उपक्रमासाठी दाद दिली. तसेच ग्रीन अमरावतीचा घोषणा सुध्दा केली. ग्रीन अमरावतीच्या संदेशासाठी विद्यार्थी फलकांसह वन्यप्राण्यांच्या वेशभूषेतग्रीन रॅलीत सहभागी झालेल्या तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाच्या विषयी विविध फलके हाती घेऊन जनजागृती केली. निसर्ग वाचवा, झाडे लावा, वाघ जंगलाची शान आहे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हे जीवन, स्वच्छ भारत सुंदर भारत असे विविध फलके विद्यार्थ्यांच्या हाती होती. तसेच वाघ, सिंह, माकडासह अन्य वन्यप्राण्याच्या वेषभूषा विद्यार्थी होते. त्यामुळे या रॅलिला आगळवेगळे स्वरुप आले होते.