शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद ...

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद केलेली आहे. स्त्रीयांऐवजी पुरुषांनी शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजनास मदत व्हावी, हा यामागील उद्देश आहे. मात्र, अलीकडे पुरुषांनी या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सन २०-२१ ७३ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया केल्याचे जिल्हा परिषदेच्या दफ्तरी नोंद आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागात ८८५ आणि शहरी भागात १९६ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ग्रामीण भागात ६५, तर शहरी भागात केवळ ८ पुरुषांनी वर्षभरात ही शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. स्त्रीयांना १२९९७ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. यात ग्रामीण भागात १०६०५ आणि शहरी भागात १४२९ शस्त्रक्रिया अपेक्षित होत्या. मात्र, एप्रिल ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ग्रामीण भागात ९६२, तर शहरी भागात २३९१ स्त्रीयांची शस्त्रक्रिया आटोपली. याची टक्केवारी १८.४० इतकी आहे. ८७ बिनटाका शस्त्रक्रिया झालेल्या आहे. टाका ॲब्डोमिनलच्या २२३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याची टक्केवारी १८.७२ इतकी आहे. अनावश्यक गर्भधारणा रोखण्याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून तांबीचा वापर वाढला. त्यामुळे आता कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

बॉक्स

तालुकानिहाय शस्त्रक्रिया

तालुका उद्दिष्ट प्रगतीपर टक्केवारी

वरूड ११७७ ४५० ३८.२

चिखलदरा ६४९ २३८ ३६.५

अचलपूर १६४५ ५८५ ३५.६

धारणी ११८९ २३३ १९.६

मोर्शी १०४२ १८४ १७.७

नांदगाव ७९५ १३९ १७.५

भातकुली ६८१ ११९ १७.५

धामणगाव ७६६ १२० १५.७

दर्यापूर ९६० १२० १२.५

अमरावती ७६९ ७१ ९.२

तिवसा ७३६ ४८ ६.५

चांदूर बाजार ११०५ ५५ ५.०

चांदूर रेल्वे ५२५ १५ २.९

अंजनगाव ९५८ १५ १.६

अमरावती जिल्हा १२९९७ २३९१ १८.४

--------

सन २०१९ मध्ये

उद्दिष्ट १२९९२

शस्त्रक्रिया ५१५७

सन २०२० मध्ये

उद्दिष्ट १२९९७

शस्त्रक्रिया २३९१

कोट

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्जनद्वारा केल्या जातात. यासाठी नियोजित शिबिराचे आयोजन केले जातात. मात्र यंदा कोरोनामुळे शक्य तितकेच शिबिर घेता आले. त्यामुळे उद्दिष्ट गाठता आले नाही.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी.