शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने गाठला चार तपांचा प्रवास

By admin | Updated: February 22, 2016 00:50 IST

देशात पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक आहे.

१४ गावांचे पुनर्वसन : वाघांची संख्या वाढीस लावलीअमरावती : देशात पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना होऊन ४२ वषर््े लोटले आहे. १४ गावांचे यशस्वी पुनर्वसन, ६० पेक्षा जास्त वाघांचे संरक्षण, वनसंपदेचे जतन तर राज्यात मूल्यांकनात अव्वल येण्याचा बहुमान पटकावित मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने चार तपाचा प्रवास केला आहे.२२ फेब्रुवारी १९७४ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र सुमारे २७६८.५२ चौरस कि.मी. आहे. सातपुडा मायकेल पर्वत रांजीतील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वनांची संलग्नता दर्शविणारे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे. व्याघ्र प्रकल्पात खाद्य व पाण्यामुळे वाघांची संख्या वाढीस लागल्याची नोंद आहे. २२ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलात ११२ पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. या दलात सहायक वनसरंक्षक दर्जाचा एक प्रमुख अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ ३ वनपरिक्ष्यत्र अधिकारी, ८१ वनरक्षक व २७ वननिरीक्षक असे एकू ण ११२ पदे निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याअनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक सहायक वनसंरक्षक, दोन वनपरिक्षेत्र अधिकारी रुजू झाले आहेत. ६६ नवरक्षक व २२ वननिरीक्षक रुजू झाले आहेत. या पदाच्या आस्थपनेवर होणारा खर्च १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागविला जात आहे. व्याघ्र प्रकल्पात विविध नावीण्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना, ग्राम परिसर विकास समिती, सिलेज आदी योजना राबविल्या जात आहे. देशात पहिल्यांदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत या सेलने देशभरातून ५० पेक्षा जास्त तस्करांना अटक केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौरविलेमेळघाट व्याघ्र प्रकल्पाने १४ गावांचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांच्यातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या मुल्याकंनानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने देशात सहावा, मध्य भारतात दुसरा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय पर्यारवण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांना २० जानेवारी सन्मानित केले आहे.सोमवारी ४२ वा स्थापना दिवसमेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा ४२ वा स्थापना दिन सोमवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संचालनालयाच्या ‘कुलाढाप’ सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विशेष उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड हे राहतील, अशी माहिती क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी दिली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव होईल.