शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील नियोजन समितीची बैठक अखेर रद्द

By admin | Updated: August 25, 2014 23:42 IST

नियोजन ठरविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी मुंबईत बोलाविले होती.

अमरावती : नियोजन ठरविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी मुंबईत बोलाविले होती. मात्र ही बैठक नियमबाह्य असल्याचा आक्षेप समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विरोधकांनी नोंदविताच अखेर विरोधकांपुढे नमती घेत ऐनवेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्र्यावर ओढविली आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला मागील काही महिन्यांपासून ब्रेक लागला होता. जिल्ह्याची विकासकामे निवडणुकीपूर्वी मार्गी लागावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक मुंबई मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बोलविण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्गी लागावीत यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला या बैठकीच्या आयोजनाची माहिती दूरध्वनी संदेशाव्दारे दिली होती. पालकमंत्र्यांचा संदेश शिरोधार्थ मानून जिल्हा नियोजन विभागाने बैठकीची सर्व तयारीदेखील केली अन् समितीच्या सर्व सदस्यांना निमंत्रण अन् बैठकीच्या माहितीसह प्रोसिडींगची प्रतही देण्यात आली. अशातच जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या काही विरोधी पक्षाच्या सदस्य सुधीर सूर्यवंशी, सतीश हाडोळ व अन्य काही सहकाऱ्यांनी दरम्यान समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना लेखी स्वरूपात पत्र दिले. या पत्रात महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) नियम १९९९चे कलम ४ (१) अन्वये समितीच्या सर्व सभा संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेतली जातील, अशी तरतुद आहे. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेली मुंबई येथील नियोजन समीतीची सभा नियमबाह्य आहे. शासनाच्या नियमात अशी तरतूद असतानाही ही सभा कुठल्या आधारे मुंबईत बोलविण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांनी याबाबत लेखी स्वरूपात मते द्यावी, असे पत्र दिले एवढेच नव्हेतर तातडीने पत्र मिळताच या मुद्दावर न्यायालयात धाव घेण्याचेही पत्रात नमूद असल्यामुळे शासनाच्या पायाखालची वाळू सरकू लागली.दरम्यान ही बाब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली असता पालमंत्र्यांचीही मोठी अडचण झाली. अखेर पालमंत्री विखे पाटील यांना विरोधकांनपुढे नमती घेत मुंबईतील ही बैठक रद्द करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला. पालमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे विरोधकांनी दिलेली मोठी चपराक असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.