शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

वाघाच्या रुपात भेटला सोकारी

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत.

वैभव बाबरेकर अमरावतीपोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत. वाघाच्या आगमनाने वनविभाग अलर्ट असला तरी वाघाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकरी मात्र सुखावला आहे. वाघाच्या दबदब्यामुळे एरवी शेतीतील पिकांची नासधूस करणारे उपद्रवी वन्यपशू आता शेतांकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे वाघाच्या रूपात एकप्रकारचा बेदरकार सोकारीच भेटल्याची सकारात्मक प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत. जीवांच्या अन्नसाखळीत वाघाचे सर्वोच्च स्थान आहे. त्याला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे कार्य वाघ करतो. महाराष्ट्र राज्य वनविभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये वाघांची विशिष्ट गणना करण्यात आली होती. त्यानुसार व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात एकूण २०३ वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले. जिल्ह्यातील मेळघाटच्या समृद्ध जंगलातही वाघांचे वास्तव्य असून आता वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातही वाघांचा अधिवास आहे. वाघांच्या मुक्त संचारामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाघांच्या दमदार एन्ट्रीमुळे शेतकरी मात्र सुखावले आहेत. वाघांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता इस्तत: पळालेले वन्यप्राणी आता शेतीपिकांचे नुकसान करण्यास शेतात शिरत नाहीत. त्यामुळे पीकहानी कमी झाली आहे. शेतकरी परिश्रमपूर्वक पेरणी करतात. मोठ्या जतनाने पिके वाढवितात. मात्र, हाताशी आलेले पीक वन्यपशू नेस्तनाबूत करीत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. जंगलानजीकच्या शेतात निलगायी, हरीण, रानडुकरे, रोही आदींचा उपद्रव नेहमीचाच झाला होता. शेतकरीवर्ग निर्धास्त अमरावती : यामुळे शेतकऱ्यांना आजवर लाखोंचे नुकसान सोसावे लागले. मात्र, जेव्हापासून वाघाने या जंगलात मुक्काम ठोकला आहे तेव्हापासून अन्य वन्यपशुंनी शेतांकडे फिरकरणे बंदच केले आहे. परिणामी पिकांची हानी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या बिनधास्त वावरामुळे अन्य वन्यपशू दबावात वावरत असून शेतकऱ्यांना मात्र निर्धास्त झोपण्याची संधी मिळाली आहे. याबाबीला वनविभागाने दुजोरा दिला.ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास वन्यपशुंचा उपद्रव झाला कमी जंगलात वाघाचा वावर असल्याने अन्य वन्यप्राणी सैरावैरा झाले आहेत. वाघाच्या भीतीपोटी ते सुरक्षीतस्थळी गेले आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे. वाघाचा अधिवास सिद्ध झाल्यानंतर उपद्रवी वन्यप्राण्यांपासून होणार नुकसान कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. - यादव तरटे, वन्यजीव पे्रमी तथा पक्षीप्रेमी