शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

वाघाच्या रुपात भेटला सोकारी

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत.

वैभव बाबरेकर अमरावतीपोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत. वाघाच्या आगमनाने वनविभाग अलर्ट असला तरी वाघाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकरी मात्र सुखावला आहे. वाघाच्या दबदब्यामुळे एरवी शेतीतील पिकांची नासधूस करणारे उपद्रवी वन्यपशू आता शेतांकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे वाघाच्या रूपात एकप्रकारचा बेदरकार सोकारीच भेटल्याची सकारात्मक प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत. जीवांच्या अन्नसाखळीत वाघाचे सर्वोच्च स्थान आहे. त्याला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे कार्य वाघ करतो. महाराष्ट्र राज्य वनविभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये वाघांची विशिष्ट गणना करण्यात आली होती. त्यानुसार व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात एकूण २०३ वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले. जिल्ह्यातील मेळघाटच्या समृद्ध जंगलातही वाघांचे वास्तव्य असून आता वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातही वाघांचा अधिवास आहे. वाघांच्या मुक्त संचारामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाघांच्या दमदार एन्ट्रीमुळे शेतकरी मात्र सुखावले आहेत. वाघांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता इस्तत: पळालेले वन्यप्राणी आता शेतीपिकांचे नुकसान करण्यास शेतात शिरत नाहीत. त्यामुळे पीकहानी कमी झाली आहे. शेतकरी परिश्रमपूर्वक पेरणी करतात. मोठ्या जतनाने पिके वाढवितात. मात्र, हाताशी आलेले पीक वन्यपशू नेस्तनाबूत करीत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. जंगलानजीकच्या शेतात निलगायी, हरीण, रानडुकरे, रोही आदींचा उपद्रव नेहमीचाच झाला होता. शेतकरीवर्ग निर्धास्त अमरावती : यामुळे शेतकऱ्यांना आजवर लाखोंचे नुकसान सोसावे लागले. मात्र, जेव्हापासून वाघाने या जंगलात मुक्काम ठोकला आहे तेव्हापासून अन्य वन्यपशुंनी शेतांकडे फिरकरणे बंदच केले आहे. परिणामी पिकांची हानी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या बिनधास्त वावरामुळे अन्य वन्यपशू दबावात वावरत असून शेतकऱ्यांना मात्र निर्धास्त झोपण्याची संधी मिळाली आहे. याबाबीला वनविभागाने दुजोरा दिला.ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास वन्यपशुंचा उपद्रव झाला कमी जंगलात वाघाचा वावर असल्याने अन्य वन्यप्राणी सैरावैरा झाले आहेत. वाघाच्या भीतीपोटी ते सुरक्षीतस्थळी गेले आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे. वाघाचा अधिवास सिद्ध झाल्यानंतर उपद्रवी वन्यप्राण्यांपासून होणार नुकसान कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. - यादव तरटे, वन्यजीव पे्रमी तथा पक्षीप्रेमी