शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शेतीची यांत्रिक मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर; अवजारांची बँक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:29 IST

Amravati News शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्दे डिझेलचा दर - ८६.५४ रुपये गतवर्षी नांगरणी - ५०० रुपये प्रतिएकर यंदा नांगरणी - ७०० रुपये प्रतितास

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :  शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.गतवषार्पेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व तूरदेखील वेळेच्या अगोदर निघाल्याने शेते पूर्णत: रिकामी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या मागे लागला असला तरी डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे आवाक्?याबाहेर झाले असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.एकीकडे डिझेलसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी, असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे.बैलजोड्यांची संख्या घटलीअलीकडे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली आणि सोबतच बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने करू लागला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक गावात दहा ट्रॅक्टरच्या वर अधिक संख्या झाली आहे. प्रत्येक शेतकरी नांगरणी, वखरणीच नव्हे, पेरणी व पिकांना फवारणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने करीत आहेत.रासायनिक खताचा वापर होत असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी जमिनीचा कडकपणा वाढला. त्यामुळे बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी केली, तर फायद्याचे ठरते. यंदा त्याचा दरही वाढला आहे.- राजू झलके, जळगाव आर्वीडिझेलचा दर गतवर्षी प्रतिलिटर ६७ रुपयांच्या आसपास होता. तो आता ८६ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रतिएकराचा मोबदला आता प्रतिलिटरवर गेला आहे. शेतकऱ्यांनी ८० टक्के मोबदला दिला, तर काही तरी शिल्लक पडेल.- महेंद्र इंगळे, कावली वसाडएकल शेती करण्याऐवजी अवजारांची बँक गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केल्यास शेतीच्या खचार्चा भार वहन करणे सोपे जाईल. हा विचार बोलून दाखवण्याऐवजी लवकरात लवकर कृतीत आणावा लागेल.- सूरज शिसोदे, नायगाव

टॅग्स :agricultureशेती