शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना; वन विभागात रेस्क्यू पथकाला सैन्यासमान मिळणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 11:42 IST

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे.

ठळक मुद्देराज्यात ३२ शीघ्र बचाव दलाची स्थापना, मानव-वन्यजीव संघर्ष टळणार

अमरावती : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असून, ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्या अनुषंगाने वन विभागात शीघ्र बचाव दलाची स्थापना (रेस्क्यू पथक) करण्यात आली आहे. मात्र, या रेस्क्यू पथकाला सैनिकासमान प्रशिक्षण देण्याची तयारी वन विभागाने चालविली आहे.

अमरावती येथे गत आठवड्यात तिसरी राज्यस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची ‘अतिशीघ्र कृती दल बळकटीकरण आणि मानव वन्यजीव संघर्ष’ या विषयावर परिषद पार पडली. यामध्ये वन विभागात स्थापन करण्यात आलेल्या विविध ३२ शीघ्र बचाव दलाच्या सदस्यांना सैनिकांप्रमाणे अचूक प्रशिक्षण देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याकरिता राज्य शासनाने रेस्क्यू पथकासाठी निधीदेखील उपलब्ध केला आहे.

गत काही वर्षांत विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात मानवी वस्तीत वाघांच्या मुक्त संचारामुळे वन विभागाला अनेक संकटांतून सामोरे जावे लागले. यवतमाळ जिल्ह्यात अवनी या ‘मॅन इटर’ वाघिणीला ठार करावे लागले. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. शीघ्र कृती दल विभागीय स्तरावर न राहता ते तालुका, गावस्तरावरही असणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुटका जलद गतीने करण्यात मदत होणार आहे.

रेस्क्यू पथकाचे हे असेल कर्तव्य

- वन्यप्राणी मनुष्यवस्तीमध्ये वन्यप्राण्यांचे सुरक्षित रेस्क्यू करणे.

- मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळणे

- रेस्क्यू पथकाने त्वरित कुशलतेने आणि तज्ज्ञांप्रमाणे कार्यवाही करणे.

- पथकाला अत्यावश्यक साहित्य, वाहनांची सुविधा पुरविणे.

- सामान्य लोकांची अपेक्षापूर्ती

- वन्यप्राण्यांपासून मनुष्याला कोणतीही इजा पोहोचू नये.

- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वन्यप्राण्यांचे रेस्क्यू.

वन विभागाच्या रेस्क्यू पथकाचे कर्तव्य आणि नागरिकांमध्ये या पथकाबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल. या पथकाला कॉमन युनिफार्म असेल. तत्क्षणी लाेकांच्या मदतीला धावून जाणे हे शीघ्र बचाव दलाकडून अपेक्षित आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (महाराष्ट्र)

टॅग्स :forest departmentवनविभागSocialसामाजिकAmravatiअमरावती