शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मे महिना शून्य सावलीचा; ३ मे पासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 17:49 IST

राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली दिवस राहणार आहे.

ठळक मुद्दे२५ मे रोजी अमरावतीतून होणार सावली गायब

लोकमत न्यूज नेटवर्कधीरेंद्र चाकोलकर/अमरावती : राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली दिवस राहणार आहे.महाराष्ट्रात ३ मे रोजी सावंतवाडी व बेळगाव, ४ मे रोजी मालवण, ५ मे रोजी देवगड, राधानगरी व मुधोळ, ६ मे रोजी कोल्हापूर व इचलकरंजी, ७ मे रोजी रत्नागिरी, सांगली व मिरज, ८ मे रोजी जयगड व कराड, ९ मे रोजी चिपळूण व अक्कलकोट, १० मे रोजी सातारा व पंढरपूर, ११ मे रोजी महाबळेश्वर, फलटण व तुळजापूर, १२ मे रोजी माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद व औसा, १३ मे रोजी मुळशी पुणे, दौंड व लातूर, १४ मे रोजी अलिबाग, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड, जामखेड व अंतर्गत, १५ मे रोजी मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राजगुरुनगर, बीड व गंगाखेड, १६ मे रोजी बोरिवली, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर व परभणी, १७ मे रोजी नालासोपारा, विरार, आसनगाव व वसमत, १८ मे रोजी पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड व हिंगोली, १९ मे रोजी नाशिक, कोपरगाव, डहाणू, वैजापूर, औरंगाबाद, जालना व पुसद, २० मे रोजी तलासरी, मेहकर, वाशिम, वणी, चंद्रपूर व मुल, २१ मे रोजी मनमाड, कन्नड व चिखली, २२ मे रोजी मालेगाव, चाळीसगाव, बुलडाणा, यवतमाळ व आरमोरी, २३ मे रोजी खामगाव, अकोला व वर्धा, २४ मे रोजी धुळे, जामनेर शेगाव निंभोरा उमरेड २५मे रोजी साखरी, अमळनेर, जळगाव, भुसावळ व अमरावती, २६ मे रोजी चोपडा, परतवाडा व नागपूर, २७ मे रोजी नंदुरबार, शिरपूर व गोंदिया आणि २८ मे रोजी शहादा व पांढुर्णा येथे शून्य सावली नागरिकांना अनुभवता येणार आहे.शून्य सावलीमागील कारणपृथ्वीच्या २३.३० अंशाने कललेल्या अक्षामुळे दक्षिणायन व उत्तरायण आणि दिवस लहान-मोठे होत असतात. त्याच्या परिणामी ही शून्य सावली अनुभवता येते.तर विषुववृत्तावरच असती शून्य सावलीकर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यात सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडत असतात. त्यामुळे या भागातच वषार्तून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे व मकरवृताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच तिची सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता, तर फक्त विषुवृत्तावर नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती.अंदमान निकोबार बेटापासून प्रारंभभारतात ६ एप्रिलला अंदमान-निकोबार बेटापासून शून्य सावलीला सुरुवात झाली आहे. भारतातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांतून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकाकडून सूर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. त्यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सूर्य कधीच डोक्यावर येणार नाही.शून्य सावलीचा असा घ्या आनंदनागरिकांनी नमूद दिवशी समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल पेन्सिल अथवा तत्सम वस्तू किंवा एखादा डबा अगदी सरळ उभा ठेवून शून्य सावलीचा थरार अनुभवावा. लॉडाउनच्या काळात आलेली ही आनंददायी पर्वणी ठरेल, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :scienceविज्ञानZero Shadow Dayशून्य सावली दिवस