शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

By admin | Updated: November 7, 2016 00:24 IST

मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या ...

नरबळी प्रकरण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खडीमलला भेटचिखलदरा : मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमिवर अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वेळा या गावात भेट देऊन पोलीस प्रशासन, गावकरी, पीडित कुटुंबांची भेट घेतली. या घटनेमागील वस्तुस्थिती काय असावी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे. पारंपरिक पूजा करण्याचा, त्यासाठी कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा मेळघाटात आहे. पण अंधश्रद्धेपोटी मानवी बळी देण्याचा घडलेला हा प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. कुटुंबाशी व गावकऱ्यांशी बोलण्यातून असे पुढे आले की गावात शेती हंगाम संपल्यावर स्थानिक पातळीवर कुठलेही काम उपलब्ध होत नसल्याने व पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने बहुतेक कुटुंब हाताला काम मिळवण्यासाठी गाव सोडून बाहेर पडतात. काही वर्षांअगोदर सुधाकर सावलकरचे संपूर्ण कुटुंब व काही गावकरी रस्ता बांधणीच्या कामासाठी ठेकेदारांकडे गेले होते. यादरम्यान या कामावरून दुसरीकडे मजूर नेत असताना त्या वाहनाचा अपघात झाला. त्यातील बहुतेक मजूर मृत पावले. पण सुधाकर व त्याचे संपूर्ण कुटुंब त्यातून बचावले व वेळेस देवीच्या कृपेने तुम्ही वाचले, असे तेथे उपस्थितांपैकी कोणीतरी सुधाकरला म्हटले व तेव्हापासून सुधाकर देवीची भक्ती करू लागला. यातूनच तो कधीकधी देवी स्वप्नात आली, देवीने मला आदेश दिला, असे तो गावातील लोकांना सांगत होता. निर्व्यसनी असलेला सुधाकर लोकांपासून दूर राहून नेहमी आपल्या शेती व कुटुंबात रमलेला असायचा. ऐन दिवाळीच्या दिवशी या क्रूरकर्म्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार करून आपल्या पूजेची सांगता केली. अंधश्रद्धा किती घातक असू शकते आणि अंधश्रद्धाळू माणूस किती टोकाची भूमिका घेऊ शकते, हे खडीमल गावातील या भयानक प्रकरणातून पुढे आले आहे. एवढी क्रूर घटना घडूनदेखील शासनाचा कुठल्याही प्रतिनिधीने अजूनपर्यंत भेट दिली नाही. आदिवासी विभागाचे १२ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात आदिवासी कुटुंबात ही घटना घडूनही कोठल्याच अधिकाऱ्याने भेट दिली नाही. यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीत कार्याध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उमेश चौबे, महासचिव हरीश देशमुख, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, उत्तम सुळके, अशोक खुजनारे, मंगेश खेरडे यांचा समावेश होता. ही सर्व मोहीम अ‍ॅड. गणेश हलकारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. (तालुका प्रतिनिधी)