शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

By admin | Updated: November 7, 2016 00:24 IST

मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या ...

नरबळी प्रकरण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खडीमलला भेटचिखलदरा : मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमिवर अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वेळा या गावात भेट देऊन पोलीस प्रशासन, गावकरी, पीडित कुटुंबांची भेट घेतली. या घटनेमागील वस्तुस्थिती काय असावी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे. पारंपरिक पूजा करण्याचा, त्यासाठी कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा मेळघाटात आहे. पण अंधश्रद्धेपोटी मानवी बळी देण्याचा घडलेला हा प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. कुटुंबाशी व गावकऱ्यांशी बोलण्यातून असे पुढे आले की गावात शेती हंगाम संपल्यावर स्थानिक पातळीवर कुठलेही काम उपलब्ध होत नसल्याने व पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने बहुतेक कुटुंब हाताला काम मिळवण्यासाठी गाव सोडून बाहेर पडतात. काही वर्षांअगोदर सुधाकर सावलकरचे संपूर्ण कुटुंब व काही गावकरी रस्ता बांधणीच्या कामासाठी ठेकेदारांकडे गेले होते. यादरम्यान या कामावरून दुसरीकडे मजूर नेत असताना त्या वाहनाचा अपघात झाला. त्यातील बहुतेक मजूर मृत पावले. पण सुधाकर व त्याचे संपूर्ण कुटुंब त्यातून बचावले व वेळेस देवीच्या कृपेने तुम्ही वाचले, असे तेथे उपस्थितांपैकी कोणीतरी सुधाकरला म्हटले व तेव्हापासून सुधाकर देवीची भक्ती करू लागला. यातूनच तो कधीकधी देवी स्वप्नात आली, देवीने मला आदेश दिला, असे तो गावातील लोकांना सांगत होता. निर्व्यसनी असलेला सुधाकर लोकांपासून दूर राहून नेहमी आपल्या शेती व कुटुंबात रमलेला असायचा. ऐन दिवाळीच्या दिवशी या क्रूरकर्म्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार करून आपल्या पूजेची सांगता केली. अंधश्रद्धा किती घातक असू शकते आणि अंधश्रद्धाळू माणूस किती टोकाची भूमिका घेऊ शकते, हे खडीमल गावातील या भयानक प्रकरणातून पुढे आले आहे. एवढी क्रूर घटना घडूनदेखील शासनाचा कुठल्याही प्रतिनिधीने अजूनपर्यंत भेट दिली नाही. आदिवासी विभागाचे १२ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात आदिवासी कुटुंबात ही घटना घडूनही कोठल्याच अधिकाऱ्याने भेट दिली नाही. यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीत कार्याध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उमेश चौबे, महासचिव हरीश देशमुख, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, उत्तम सुळके, अशोक खुजनारे, मंगेश खेरडे यांचा समावेश होता. ही सर्व मोहीम अ‍ॅड. गणेश हलकारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. (तालुका प्रतिनिधी)