शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाची कापूस खरेदी बुधवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:43 IST

कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुहूर्त सापडला : सीसीआयची दोन खरेदी केंदे्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. दोन केंद्रांवर सीसीआय खरेदी करणार आहे. दरम्यान, सोमवारी यासंदर्भात सीसीआयसोबत पणन महासंघाचा करार झाला आहे.जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, वरूड, तिवसा व अचलपूर या केंद्रांवर पणन महासंघ बुधवारपासून कापसाची खरेदी करणार आहे. चांदूर रेल्वे व धामणगाव केंद्रांवर सीसीआयद्वारा खरेदी होणार आहे. मात्र, ही केंद्र कधी सुरू होणार, याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२० रुपये प्रति क्विंटल, तर एच ४, एच ६ ला ४ हजार २२० व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२० रुपये हमीभाव राहणार आहे.यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली.नंतरही पावसाचा ताण असल्याने पिकाची वाढ खुंटली होती. आॅनलाइन नोंदणी कापसाच्या विक्रीपूर्व शेतकºयांना बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सातबारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकºयांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकºयांना केवळ सातबारा द्यावा लागत होता. परंतु, आता आॅनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, रसशोषक किडी, लाल्या व गुलाबी बोंडअळींनी हल्ला चढविला. यामुळे कपाशीच्या उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी घट येणार आहे. दिवाळीपूर्व कापसाची वेचणीच झालेली नाही. आता बोंडे फुटायला सुरुवात झाली, तर अवकाळीने कापूस ओला झाला आहे. ज्या शेतकºयांनी धूळपेरणी केली होती, त्या शेतकºयांचाच कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे. सद्यस्थितीत प्रतवारीनुसार कापसाला चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव खुल्या बाजारात मिळत आहे.यंदा कापसाच्या भाववाढीची शक्यताअनेक कापूस उत्पादक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे विदेशात कापसाच्या गाठी निर्यातीला मोठी संधी असल्याने पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कापसाच्या वेचण्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पणन महासंघाची केंद्रे सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला असला तरी खरेदीसाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.सीसीआयसोबत सोमवारी पणन महासंघाचा करारनामा होत आहे. राज्यात ६० केंद्रांवर खरेदीची परवानगी मिळाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात पाच केंद्रांवर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यात येईल.- छाया दंडाळेसंचालक, पणन महासंघ, मुंबई