शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी नेरपिंगळाईत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा ...

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा राज्य मार्ग असून तिवसा, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला आहे तसेच रिद्धपूरहून परतवाडा-इंदोर- खंडवा या मार्गाशी जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते. गावाच्या मुख्य बाजारपेठेमधून हा मार्ग जात असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँक, दवाखानेदेखील याच मार्गावर असल्याने नागरिकाची वर्दळ असते.

सद्यस्थितीत हा मार्ग अतिक्रमणाने वेढला असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. या मार्गाचे रुंदीकरण करावे, या मागणीकरिता ग्रामपंचायत सदस्य व प्रहार रुग्ण समिती तालुकाध्यक्ष रूपेश गणेश यांनी १२ जुलैपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ जुलै रोजी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली.

मंजूर झालेला रस्ता हा १६ मीटरचा व्हावा. अतिक्रमण काढल्यास दुकानदार व घरमालकास सरकारी नियमानुसार मोबदला द्यावा. रस्त्याच्या मधातून दुभाजक व पथदिवे बसवावे आदी मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा रूपेश गणेश यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.