शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी नेरपिंगळाईत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा ...

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा राज्य मार्ग असून तिवसा, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला आहे तसेच रिद्धपूरहून परतवाडा-इंदोर- खंडवा या मार्गाशी जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते. गावाच्या मुख्य बाजारपेठेमधून हा मार्ग जात असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँक, दवाखानेदेखील याच मार्गावर असल्याने नागरिकाची वर्दळ असते.

सद्यस्थितीत हा मार्ग अतिक्रमणाने वेढला असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. या मार्गाचे रुंदीकरण करावे, या मागणीकरिता ग्रामपंचायत सदस्य व प्रहार रुग्ण समिती तालुकाध्यक्ष रूपेश गणेश यांनी १२ जुलैपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ जुलै रोजी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली.

मंजूर झालेला रस्ता हा १६ मीटरचा व्हावा. अतिक्रमण काढल्यास दुकानदार व घरमालकास सरकारी नियमानुसार मोबदला द्यावा. रस्त्याच्या मधातून दुभाजक व पथदिवे बसवावे आदी मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा रूपेश गणेश यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.