शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी नेरपिंगळाईत बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा ...

तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा राज्य मार्ग असून तिवसा, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला आहे तसेच रिद्धपूरहून परतवाडा-इंदोर- खंडवा या मार्गाशी जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते. गावाच्या मुख्य बाजारपेठेमधून हा मार्ग जात असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँक, दवाखानेदेखील याच मार्गावर असल्याने नागरिकाची वर्दळ असते.

सद्यस्थितीत हा मार्ग अतिक्रमणाने वेढला असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. या मार्गाचे रुंदीकरण करावे, या मागणीकरिता ग्रामपंचायत सदस्य व प्रहार रुग्ण समिती तालुकाध्यक्ष रूपेश गणेश यांनी १२ जुलैपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ जुलै रोजी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली.

मंजूर झालेला रस्ता हा १६ मीटरचा व्हावा. अतिक्रमण काढल्यास दुकानदार व घरमालकास सरकारी नियमानुसार मोबदला द्यावा. रस्त्याच्या मधातून दुभाजक व पथदिवे बसवावे आदी मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा रूपेश गणेश यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.