शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-कुणबी एकच; कोणताही वाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

छत्रपती संभाजीराजे, कुणबी समाजानेच छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी दिली अमरावती : मराठा-कुणबी हे एकच आहेत. त्यांच्यात कोणताही वाद ...

छत्रपती संभाजीराजे, कुणबी समाजानेच छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी दिली

अमरावती : मराठा-कुणबी हे एकच आहेत. त्यांच्यात कोणताही वाद नाही. बदलत्या काळानुसार मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. एवढेच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कुणबी समाजानेच दिली, असे ठाम मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यानिमित्त अमरावती येथे आले असता खासदार संभाजीराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी, पंचवटी चौकात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी भाऊसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

श्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार नवनीत राणा, दिलीप इंगाेले, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह सकल मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सकल मराठ्यांच्यावतीने छत्रपती संभाजीराजे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, नागपूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये आयोजित जनसंवाद दौऱ्यात मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे म्हणाले, १९१७ साली खामगाव येथे छत्रपती शाहू महाराज परिषदेकरिता आले होते. त्यावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले होते. या परिषदेला उपस्थित असलेले डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी परिषदेतून प्रेरणा घेतली आणि विदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जाळे विणले, शिक्षणाची गंगा आणली, असे खासदार संभाजीराजे म्हणाले. मराठ्यांना शैक्षणिक, आर्थिक प्रगती करायची असेल, तर कुणबी व्हा, असे आवाहनदेखील भाऊसाहेबांनी केले होते. त्यांच्या हाकेला साद देणारे बहुतांश मराठे आज कुणबी झाले आहेत. जे वंचित राहिले, त्या मराठ्यांना परिस्थितीनुरूप आरक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

--------------

बॉक्स

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती करावी

राज्यात ४४० पेक्षा अधिक एमपीएससी उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, या उमेदवारांना नियुक्ती मिळत नाही. परिणामी पुण्यात आज एका उमेदवाराने त्रस्त होऊन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, राज्य शासनाने युद्धस्तरावर याविषयी निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करावी. एमपीएससी उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही दखल घेऊ, असा ईशाराही त्यांनी दिला.