शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी अनेक मतदार बाहेरगावी; उमेदवार चिंताग्रस्त

By admin | Updated: July 23, 2015 00:06 IST

गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे

समस्या : स्थलांतरित मतदारांनी उडवली झोपअमरावती : गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. या विस्थापित मतदारांना परत आणून त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा? अशा पेचात उमेदवार अडकले आहेत. एका कुटुंबातील चार ते पाच मतदार असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कसे आणावे? त्यांना आणण्यासाठी खर्चही अधिक येणार असल्याने काय करावे? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यापैकी अनेकांना तर आतापासूनच सरपंचपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. प्रत्येक जण निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. तसेच आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. त्यापैकी आपल्या जवळचे कोण? याबाबत मतदार याद्यांची तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगाराच्या शोधात तसेच अन्य कारणामुळे गाव सोडून शहरात गेले आहेत. त्यामुळे या मतदारांची मते कशी मिळावावीत?, याची तडजोड सुरू आहे. दुरावलेली मते प्रत्येकालाच हवी असल्याने हालचाली सुुरू आहेत. उमेदवारांमध्ये संभ्रमविस्थापित मतदारांना आणण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. खर्च करूनही त्यांचे मत मिळेलच याची शाश्वती उमेदवाराला बाळगता येत नाही. दुसरीकडे विरोधकांनी या मतदारांना आणले तर त्याचे पारडे जड होईल, अशा विचाराने उमेदवारांची झोप उडाली आहे. त्यामुळे विस्थापित मतदारांचे काय करावे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार संविधनाने दिला आहे. त्यामुळे मतदान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विस्थापित मतदारांनीही आपले कर्तव्य समजून मतदानास आले पाहिजे.-जयकृष्ण सहारे,मतदार