शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

एसडीओंच्या ‘त्या’ पेटीत बरेच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:19 IST

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत.

ठळक मुद्देसोन्याच्या कड्यासह मौल्यवान वस्तू : २७ वर्षांपासून बंद अवस्थेत, कुतूहल वाढले

अनिल कडू।आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत. या मौल्यवान वस्तू जवळपास दीडशे वर्षांर्हून अधिक जुन्या आहेत. यात सोन्याचे कडे, पोत, आणि पुरातन नाण्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या या मौल्यवान वस्तूंची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. या पेट्यांमध्ये मोगलांसह इंग्रजकालीन बरेच काही आढळून येण्याची शक्यता आहे.अचलपूर एसडीओंच्या नावे असलेल्या या दोन पेट्या अचलपूर कोषागार कार्यालयात आहेत. या पेट्यांची मालकी अचलपूर एसडीओ यांच्याकडेच आहे. दर तीन वर्षांनी एसडीओ या पेट्या उघडतील, पाहणी करतील व त्याची नोंद घेतील, असा नियम आहे. मात्र, प्रत्यक्षात या पेट्या मागील २७ वर्षांत कुणी उघडल्याच नाहीत. २७ वर्षांनंतर तत्कालीन एसडीओ म्हस्के यांनी या पेट्या उघडल्यात. त्यांनी पाहणी करून नोंदी घेतल्या. अन् पेट्या परत कुलूपबंद केल्यात. या पेट्यांमध्ये त्यांना नेमके काय आढळून आले याची माहिती बाहेर आली नाही. दुसरीकडे कोषागारात असलेल्या या पेट्या एसडीओंच्या असल्यामुळे कोषागार अधिकारी त्याला हातही लावत नाहीत. केवळ सुरक्षेची जबाबदारी ते स्वीकारून आहेत. या पेट्या उघडण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. केवळ मौल्यवान वस्तू असलेल्या पेट्याा म्हणूनच ते त्याकडे बघतात. त्या पेट्या आणखी किती दिवस बंदच राहतील, असा प्रश्न पडला आहे.- तर होईल उलगडातत्कालीन एसडीओ म्हसके यांच्या नंतर आता अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांच्याकडे या पेट्या उघडण्याची जबाबदारी आहे. पण याकरिता त्यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार आहे. राठोड यांनी या पेट्या उघडल्यानंतरच पेटीतील मौल्यवान वस्तूंचा उलगडा होऊ शकेल आणि रिझर्व्ह बँकेकडे त्या वस्तू जमा करण्याचा मार्ग मोकळा होईल.त्यात असावे तरी काय?पेटीत असलेल्या मौल्यवान वस्तूंच्या विवरणासह नोंद असलेले नोंद रजिस्टर उपलब्ध नाही. केवळ एक कार्यालयीन टिपण्णी आहे. या टिप्पणीवरच पेटी उघडली जाते. वस्तू बघितल्याची नोंद अचलपूर एसडीओ घेतात. इंग्रजी राजवटीत अचलपूर हा जिल्हा होता. जिल्ह्याचे मुख्यालय अचलपूरला होते. तत्कालीन इंग्रज आधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू या पेट्यांमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अनेक एसडीओंनी पेट्या उघडल्याच नाहीप्रत्यक्षात या मौल्यवान वस्तू तत्कालीन अधिकार्यांनी तेव्हाच रिजर्वबँकेकडे जमा करायला हव्या होत्या . पण त्या अजूनही अचलपूर मध्येच दोन पेट्यांमध्ये मध्ये पडून आहेत. दर तीन वर्षांनी पेटी उघडण्याचा, मौल्यवान वस्तू बघून नोंदी घेण्याचा दंडक असतानाही अचलपूर मधून बदलून गेलेल्या अनेक एसडीओनी त्यांच्या कार्यकालात याची दखलही घेतली नाही. किंबहुना अधिनस्त यंत्रनेने त्यांना याची कल्पनाच दिली नाही .