शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘त्या’ मॅनेजमेंट, सिनेट सदस्यांना नोटीस बजावून खुलासा मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

अमरावती : कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत २५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेनंतर संत गाडगेबाबा अमरावती ...

अमरावती : कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत २५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेनंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नाहक बदनामी झाली. जे विषय सभागृहात मांडणे अपेक्षित होते, ते सार्वत्रिक करण्यात आल्याप्रकरणी ‘त्या’ व्यवस्थापन परिषद, सिनेट सदस्यांना नोटीस बजावून खुलासा मागण्याचा निर्णय ऑनलाईन सिनेट सभेत मंगळवारी घेण्यात आला.

‘नुटा’ व समविचारी संघटनांचे व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांनी २५ डिसेंबर रोजी पत्रपरिषद घेऊन २९ डिसेंबर रोजी आयोजित सिनेट सभेत प्रश्न नाकारणे व विविध चौकशी समितीचे अहवाल प्रलंबित

असल्याप्रकरणी कुलगुरू चांदेकर यांच्यावर ताशेरे ओढले होते. यासंबंधी वृत्त २६ डिसेंबर रोजी वृत्तपत्रांत

झळकले होते. या घडामोडींमुळे विद्यापीठाची बदनामी झाली. शैक्षणिक क्षेत्र असलेल्या विद्यापीठाची अशाप्रकारे बदनामी करणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ६४ नुसार सबंधित सदस्य कारवाईस पात्र असल्याचा ‘पॉंईंट ऑफ ऑर्डर’द्वारे सिनेट सदस्य रवींद्र कडू यांनी मुद्दा उपस्थित केला. बेताल वक्तव्य करणाऱ्या दाेषी सदस्यांवर नियमानुसार निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र कडू यांनी रेटून धरली. यावेळी प्रदीप खेडकर, दीपक धोटे, मीनल ठाकरे, आशिक उत्तरवार, के.एम. कुळकर्णी, मनीष गवई, उत्पल टोंगो, नितीन खर्चे, सुनील मानकर, प्रफुल्ल गवई आदींनी मते मांडली. दरम्यान, कुलगुरू चांदेकर यांनी या विषयावर निर्णय देताना एकूणच प्रवास विशद केला. त्यामुळे पत्रपरिषदेत सहभागी ‘त्या’ सदस्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला जाणार आहे. खुलाशानंतर कारवाईची रूपरेषा ठरविली जाईल, असा निर्णय कुलगुरूंनी घेतला.---------------------

प्रदीप खेडकर, मनीष गवई यांच्यात शाब्दिक वाद

मंगळवारी आयोजित ऑनलाईन सिनेट सभेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर आणि राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांच्यात प्रश्न विचारण्यावरून वाद झाला. गवई यांनी सभेत कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याची बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. प्रदीप खेडकर यांनी मनीष गवई यांना थांबण्याचा सल्ला देताच त्यांचा पारा चढला. आवाज दाबण्याचा प्रयत्न करून नका, असे गवई म्हणाले. अखेर कुलगुरू चांदेकर यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला.