शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ

By admin | Updated: January 8, 2017 00:15 IST

सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे.

अमरावती : सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे. देशाचा पोशिंदा मात्र मरतो आहे. शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे, असा नारा आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, संजय खोडके, बबलू देशमुख, संजय अकर्ते, आदींनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विदारक स्थिती अवगत करून दिली. आ.वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर, संजय खोडके आणि बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटबंदीसंबंधीची जिल्ह्यातील स्थितीही जाणून घेतली. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांत ११०० कोटी रुपये जमा झालेत. ५९२ कोटी रुपयांचे विथ्ड्रॉल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनात आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख , प्रदेश सरचिटणिस संजय खोडके, माजी आ.सुलभा खोडके, पुष्पा बोंडे, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, प्रकाश काळबांडे, प्रकाश साबळे, बँकेचे संचालक सुरेश साबळे, हरिभाऊ मोहोड, संजय मार्डीकर, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देदू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे, स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, माजी महापौर वंदना कंगाले, श्रीराम नेहर, सिद्धार्थ वानखडे, अजय गुल्हाने, श्रोपाल पाल, सतीश हाडोळे, अविनाश राजगुरे, अभिनंदन पेंढारी, कमलेश तायडे, दिलीप काळबांडे, जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, भैया पवार, बापुरार गायकवाड मुकद्दर खाँ पठाण, सुभाष पाथरे, दीपा लेंडे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्षपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ते नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)सहा व्यापाऱ्यांवर गुन्हेहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारीचे निर्देश दिले होते, त्याचे काय झाले, असा महत्त्वाचा प्रश्न आ. जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान उपस्थित केला. त्यावर आतापर्यंत कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.