शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

२१ दिवसांत खतनिर्मिती करा अन् १ लक्ष रुपयांचे बक्षीस घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:05 IST

बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे महापालिकेला आव्हान : १५ दिवसांपासून धगधगतेय कचराभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.अमरावती शहराच्या सुकळी कम्पोस्ट डेपोतील कचऱ्यावर बायोकल्चर (जैवसंवर्धन) द्रावणाची फवारणी करून २१ दिवसांत खतनिर्मिती करून समस्येवर उपाय योजण्याची माहिती महापालिकेने जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर गांधी आणि देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना हे आव्हान दिले आहे.अमरावतीच्या कचराभूमीत सुमारे आठ लक्ष टन कचरा एकत्रित झाला आहे. आग लागल्यामुळे हा कचरा १५ दिवसांपासून धगधगत आहे. या कचऱ्यापासून सातत्याने अत्यंत घातक वायूचे उत्सर्जन होत आहे. सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या वातावरणात हा वायू आच्छादला गेला आहे. या वायू उत्सर्जनामुळे कचराभूमीजवळील लोकांनी इतरत्र स्थलांतर सुरू केले आहे.सातत्याने जळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कचऱ्यातील खतनिर्मितीयोग्यतेचे घटक नष्ट झाले आहेत. आता शिल्लक असलेला कचरा अर्थात राख आहे. जो कचरा जळला नसेलही, तो विघटन होऊ न शकणारा आहे. अशा कचऱ्याचे खत होणे कदापिही शक्य नाही. महापालिकेने केलेला दावा हा सामान्य करदात्यांच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा, असे सांगणारी महापालिका स्वत: मात्र दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र करते. कचराभूमीत ते चित्र आम्ही अनेकदा बघितले आहे. पर्यावरण चळवळीचे दिल्लीतील कार्यकर्तेही या कचराभूमीला भेट देऊन गेले. त्यांनीही तेथील अव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यूट्यूबवर त्यासंबंधी रिपोर्ट दिल्लीतील मंडळींनी अपलोड केला आहे.२०० लिटरचे गणित अनाकलनियकचऱ्यावर २०० लिटर बायोकल्चर फवारणार असल्याचे आणि त्यातून खतनिर्मिती करणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर केले आहे. आठ लक्ष टन कचºयासाठी इतकेसे बायोकल्वर अर्थात ‘उंट के मुंह मे जिरा’ अशी स्थिती आहे. सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लक्षावधी लिटर बायोकल्चरची आवश्यकता असेल. त्यासाठी महापालिकेने निरीसारख्या संस्थेला पाचारण करावयास हवे. निविदा काढूनच योग्य संस्थेला कंत्राट द्यावयास हवे, असे मत गांधी आणि देशमुख यांनी व्यक्त केले आहे.कचरा निर्मूलनाचे कुठलेही उपाय योजलेले नाहीत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. अशाच कारणांसाठी वाशी आणि इतर महापालिकांच्या आयुक्तांना शिक्षा ठोठावली गेली आहे. आम्हीदेखील केंद्रीय हरित लवादात खटला भरणार आहोत.- नंदकिशोर गांधी, प्लास्टिकबंदी अधिनियम तथा पर्यावरण तज्ज्ञकचरा सतत धुमसत असताना महापालिकेने काहीच करू नये, हा गुन्हाच आहे. सुकळी परिसरातील लोक स्थलांतरित होत आहेत. कचरा निर्मूलनाचे नियम अत्यंत कठोर आहेत. महापालिका आयुक्तांना नागरिकांनी निवेदन देऊनही त्यांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे.- किशोर देशमुख,भूवैज्ञानिक तथा पर्यावरण तज्ज्ञ