शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मजीप्राचा संप मिटला; आज होणार सुरळीत पाणीपुरवठा

By admin | Updated: December 9, 2015 00:08 IST

महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला.

अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला. मजीप्राने वेळेवर पाणीपुरवठा न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. बुधवारी या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे असताना उशिरा रात्री संप मिटल्याने ही परिस्थिती निवळली आहे. मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असतो. त्यामुळे बुधवारी पाण्यासाठी वणवण होणार होती. जिल्ह्याभरात मंगळवारी पाणीपुरवठा झाला नसल्याची माहिती शहरवासियांपर्यंत पोहचल्याने गृहिणींची तगमग वाढली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तालुकास्तरावर काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. बहुतांश गावात पाणी पोहोचले नाही. अनेक गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अनेक गावांमध्ये विहिरी आणि हॅन्डपंपांचा सहारा घ्यावा लागला. मात्र, उशिरा रात्री संप मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गावखेड्यातील नागरिकांची पायपीटअमरावती : इतर पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत १५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर या संप वजा आंदोलनाचा मोठा परिणाम झाला. या संपामुळे गावस्तरावर पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. शहरासह चिखलदरा, दर्यापूर व अंजनगावची १५६ गाव पाणी पुरवठा योजना, अंजनगांवची ७९ गाव पाणी पुरवठा योजना, अमरावती, भातकुली, अचलपूर तसेच चांदूरबाजारची १०५ गाव पाणीपुरवठा योजना मजीप्रा मार्फत संचालित करण्यात येते.