शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा, वीज कंपनीत समन्वयाचा अभाव

By admin | Updated: September 19, 2015 00:13 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाणीपुरवठ्यात दिरंगाई : वारंवार उद्भवतात कृत्रिम पाणीटंचाईचे प्रसंगअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळेच शहराला सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. जीवन प्राधिकरणकडून शहरातील ८० हजार ग्राहकांना दररोज ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. एखादवेळी पाणीपुरवठा बंद झाल्यास नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. दररोज नळ येत असल्याने बहुतांश नागरिक पाणी साठवून ठेवत नाहीत. अशाप्रसंगी पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महावितरणच्या कामामुळे वीजप्रवाह बंद झाल्यावर जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंपसुध्दा बंद होतात. पंप बंद झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात खंड पडतो. विद्युत वितरण कंपनीची दुरूस्तीची कामे सुरु करण्याआधी जीवन प्राधिकरणला सूचना देणे आवश्यक असते. त्यांना सूचना मिळाल्यावर जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना सूचना देणे अत्यावश्यक असते. मात्र, बरेचदा नागरिकांना सूचना न देताच जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याचा प्रकार घडतो. काही दिवसांपूर्वी चांदूरबाजार येथे विद्युत महावितरणने फिडरवर दुरूस्तीची कामे केलीत. त्यावेळी जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा बंद राहील, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाणी साठवून ठेवले होते. काही नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीसुध्दा करावी लागली. मात्र, वीज वितरण कंपनीने वेळेवर निर्णय बदलला. तसेच सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याबाबत कोणतीही सूचना नसल्यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली होती. पहाटे लवकर उठून बहुतांश नागरिक पाणी भरतात, मात्र, सोमवारी दोन तास नळ उशिरा आल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागले.रविवारी रात्री वीज कंपनीने जीवन प्राधिकरणाला सूचना न देता मोर्शीजवळ फिडर दुरूस्तीची कामे सुरू केली. त्याकरिता दोन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. मात्र, या कामामुळे जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंप बंद पडल्याने त्यांच्या पाणीपुरवठा नियोजनाची वेळ बदलली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेकांना पाणी मिळू शकते नाही. त्यांना इतत्र भटकंती करावी लागली.वीज कंपनी व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना वेळेवर सूचना मिळत नाही. त्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)वीज वितरण कंपनीची मोर्शी फिडरवर कामे सुरू असल्यामुळे पाण्याचे पंप बंद होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजित वेळा बदलल्या. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याआधी पूर्वसूचना दिली असती तर नागरिकांना वृत्तपत्रातून सूचना दिली असती.- प्रशांत भामरे,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.