शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

मजीप्रा, वीज कंपनीत समन्वयाचा अभाव

By admin | Updated: September 19, 2015 00:13 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाणीपुरवठ्यात दिरंगाई : वारंवार उद्भवतात कृत्रिम पाणीटंचाईचे प्रसंगअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळेच शहराला सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. जीवन प्राधिकरणकडून शहरातील ८० हजार ग्राहकांना दररोज ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. एखादवेळी पाणीपुरवठा बंद झाल्यास नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. दररोज नळ येत असल्याने बहुतांश नागरिक पाणी साठवून ठेवत नाहीत. अशाप्रसंगी पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महावितरणच्या कामामुळे वीजप्रवाह बंद झाल्यावर जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंपसुध्दा बंद होतात. पंप बंद झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात खंड पडतो. विद्युत वितरण कंपनीची दुरूस्तीची कामे सुरु करण्याआधी जीवन प्राधिकरणला सूचना देणे आवश्यक असते. त्यांना सूचना मिळाल्यावर जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना सूचना देणे अत्यावश्यक असते. मात्र, बरेचदा नागरिकांना सूचना न देताच जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याचा प्रकार घडतो. काही दिवसांपूर्वी चांदूरबाजार येथे विद्युत महावितरणने फिडरवर दुरूस्तीची कामे केलीत. त्यावेळी जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा बंद राहील, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाणी साठवून ठेवले होते. काही नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीसुध्दा करावी लागली. मात्र, वीज वितरण कंपनीने वेळेवर निर्णय बदलला. तसेच सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याबाबत कोणतीही सूचना नसल्यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली होती. पहाटे लवकर उठून बहुतांश नागरिक पाणी भरतात, मात्र, सोमवारी दोन तास नळ उशिरा आल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागले.रविवारी रात्री वीज कंपनीने जीवन प्राधिकरणाला सूचना न देता मोर्शीजवळ फिडर दुरूस्तीची कामे सुरू केली. त्याकरिता दोन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. मात्र, या कामामुळे जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंप बंद पडल्याने त्यांच्या पाणीपुरवठा नियोजनाची वेळ बदलली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेकांना पाणी मिळू शकते नाही. त्यांना इतत्र भटकंती करावी लागली.वीज कंपनी व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना वेळेवर सूचना मिळत नाही. त्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)वीज वितरण कंपनीची मोर्शी फिडरवर कामे सुरू असल्यामुळे पाण्याचे पंप बंद होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजित वेळा बदलल्या. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याआधी पूर्वसूचना दिली असती तर नागरिकांना वृत्तपत्रातून सूचना दिली असती.- प्रशांत भामरे,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.