शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

माहुलीत झाली नाही विघ्नहर्त्याची स्थापना!

By admin | Updated: September 25, 2015 00:54 IST

टिळकांचा आदर्श घेत माहुलीवासीयांनी चार वर्षांपूर्वी ९ गणेश मंडळांचे विलिनीकरण करुन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकार केली.

चिमुरड्याच्या मृत्यूनंतरचा उद्रेक : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भूमिगत, गावात भय नांदगाव पेठ : टिळकांचा आदर्श घेत माहुलीवासीयांनी चार वर्षांपूर्वी ९ गणेश मंडळांचे विलिनीकरण करुन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकार केली. मात्र, साहिल डायरे मृत्यूप्रकरणानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील नागरिकही भूमिगत झाले आहेत. त्यामुळे यावर्षी माहुलीत विघ्नहर्त्याची स्थापनाच झाली नाही. तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१२ साली माहुलीतील ९ गणेश मंडळांनी सामंज्यस्याची भूमिका घेऊन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली. मागील तीन वर्षांपासून अतिशय आनंदात गावकऱ्यांनी बाप्पाचे स्वागत केले. परंतु गत महिन्यात २५ आॅगस्ट रोजी साहिल डायरे या चिमुकल्याच्या अपघाती निधनानंतर संतप्त माहुलीवासीयांनी एसटी व अग्निशमन वाहनाची जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गावकऱ्यांना दोषी धरून त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे भयभीत नागरिकांनी गावातून पळ काढला. परिणामी गावात यंदा विघ्नहर्त्याची स्थापनाच झाली नाही. पोलिसांच्या दशहतीमुळे ऐन गणेशोत्सवात गावात शुकशुकाट पसरल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकरी अद्यापही भीतीच्या छायेत वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)