शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

३७० ग्रा.पं.मध्ये ‘महिलाराज’

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदाची

ग्रामपंचायत निवडणूक : ४ एप्रिलला आरक्षण सोडत, गावपुढाऱ्यांचा हिरमोडअमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायत सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. याव्यतिरीक्त ३५७ खुल्या प्रवर्गात देखील महिलांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बहुतांश गावात महिला राज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण घोषित न झाल्याने सरपंच पदासाठी ईच्छुक गावपुढाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. जिल्ह्यात सध्या निवडणूक असणाऱ्या मार्च २०२० दरम्यान कालावधी संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हास्तरावर एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या निवडणूक असणाऱ्या ५५२ व मार्च २०२० कालावधीपर्यंत मुदत संपणाऱ्या १७५ ग्रामपंचायतीसाठी ही सोडत आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती साठी ७०, अनुसूचित जमातीसाठी ३०, ईतर मागासवर्गीयांसाठी १०० व सर्वसामान्य प्रवर्गासाठी १०० सरपंच पदाची महिलासाठी राखीव राहणार आहे. या व्यतिरीक्त सर्वसामान्य प्रवर्गात १६० सरपंच पदे महिलांसाठी आरक्षीत, सर्वसामान्यांसाठी राखीव असणाऱ्या १५३ सरपंचामध्ये देखील काही ग्रामपंचायतमध्ये महिलांची सरपंच पदासाठी वर्णी लागू शकते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतीच्या अर्ध्यापेक्षा जास्त पदावर महिला विराजमान होत असल्याने बहुतांश गावामधील विकासाची सूत्रे महिलांकडे जावून गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)आरक्षण सोडतीने बदलणार समीकरणेशासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत व या निर्णयानंतर प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. तब्बल ३७० महिलांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये राजकीय दृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचातींचा समावेश आहे. या गावाचे सरपंच होण्यास सर्वच इच्छूक असतात. मात्र आरक्षण सोडतीमुळे अनेकांची समीकरणे बदलणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण सोडतीकडे ईच्छूकांचे लक्ष लागले आहे. गावपुढाऱ्यांना प्रतीक्षाग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच बनण्याचे डोहाळे गावपुढाऱ्यांना लागले आहे. निवडणूक जाहीर झाली. परंतु सरपंच पद आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छूकाना प्रतीक्षा करावी लागत आहे. ऐनवेळी जर सरपंच महिला राखीव झाले तर त्या प्रवर्गातील महिला शोधून कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.अन्य आरक्षण सोडत तालुकास्तरावरजिल्ह्यातील सर्व ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण विषयक सोडत जिल्ह्यात होत आहे. साधारणपणे ३७० ग्रामपंचातीसाठी सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षीत राहणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी आरक्षणाची सोडतही तालुकास्तरावर काढण्यात येणार आहे.