शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

३७० ग्रा.पं.मध्ये ‘महिलाराज’

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदाची

ग्रामपंचायत निवडणूक : ४ एप्रिलला आरक्षण सोडत, गावपुढाऱ्यांचा हिरमोडअमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायत सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. याव्यतिरीक्त ३५७ खुल्या प्रवर्गात देखील महिलांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बहुतांश गावात महिला राज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण घोषित न झाल्याने सरपंच पदासाठी ईच्छुक गावपुढाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. जिल्ह्यात सध्या निवडणूक असणाऱ्या मार्च २०२० दरम्यान कालावधी संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हास्तरावर एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या निवडणूक असणाऱ्या ५५२ व मार्च २०२० कालावधीपर्यंत मुदत संपणाऱ्या १७५ ग्रामपंचायतीसाठी ही सोडत आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती साठी ७०, अनुसूचित जमातीसाठी ३०, ईतर मागासवर्गीयांसाठी १०० व सर्वसामान्य प्रवर्गासाठी १०० सरपंच पदाची महिलासाठी राखीव राहणार आहे. या व्यतिरीक्त सर्वसामान्य प्रवर्गात १६० सरपंच पदे महिलांसाठी आरक्षीत, सर्वसामान्यांसाठी राखीव असणाऱ्या १५३ सरपंचामध्ये देखील काही ग्रामपंचायतमध्ये महिलांची सरपंच पदासाठी वर्णी लागू शकते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतीच्या अर्ध्यापेक्षा जास्त पदावर महिला विराजमान होत असल्याने बहुतांश गावामधील विकासाची सूत्रे महिलांकडे जावून गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)आरक्षण सोडतीने बदलणार समीकरणेशासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत व या निर्णयानंतर प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. तब्बल ३७० महिलांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये राजकीय दृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचातींचा समावेश आहे. या गावाचे सरपंच होण्यास सर्वच इच्छूक असतात. मात्र आरक्षण सोडतीमुळे अनेकांची समीकरणे बदलणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण सोडतीकडे ईच्छूकांचे लक्ष लागले आहे. गावपुढाऱ्यांना प्रतीक्षाग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच बनण्याचे डोहाळे गावपुढाऱ्यांना लागले आहे. निवडणूक जाहीर झाली. परंतु सरपंच पद आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छूकाना प्रतीक्षा करावी लागत आहे. ऐनवेळी जर सरपंच महिला राखीव झाले तर त्या प्रवर्गातील महिला शोधून कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.अन्य आरक्षण सोडत तालुकास्तरावरजिल्ह्यातील सर्व ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण विषयक सोडत जिल्ह्यात होत आहे. साधारणपणे ३७० ग्रामपंचातीसाठी सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षीत राहणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी आरक्षणाची सोडतही तालुकास्तरावर काढण्यात येणार आहे.