शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

Maharashtra Election 2019 ; अपक्षांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.

ठळक मुद्देचार अपक्षांनी रचला इतिहासराणांना सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून पसंतीजिल्हा परिषद सदस्य भुयार झाले आमदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांपैकी चार अपक्षांनी काबीज केले. त्यांचा विजय राजकीयदृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू आणि रवि राणा या दोघांनी आपल्या कार्यकाळात चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे यंदा बडनेरा मतदारसंघातून रवि राणा व अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना मतदारांनी पुन्हा कौल दिल्याचे वास्तव आहे. त्यातच यंदा नव्याने दोन अपक्ष मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल व मोर्शीतून देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत ‘एन्ट्री’ मिळविली आहे. जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू हे चौथ्यांदा विजयी झाले. रुग्णसेवा आणि अपंगांची मदत यासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेले बच्चू कडू यांच्या ‘चौकारा’ने जिल्ह्याचे राजकारण पालटून गेले आहे. विजयानंतर मतदारसंघात ‘अपना भिडू बच्चू कडू’ या नाऱ्यांनी आसमंत कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.मोर्शी मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवित असलेले अपक्ष देवेंद्र भुयार यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना धोबीपछाड दिला. जिल्हा परिषद सदस्य असलेले देवेंद्र भुयार हे असून, त्यांची लढवय्या अशी ओळख आहे. मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला. वाहन पेटवून दिले. भुयार यांना किरकोळ जखमा झाल्या होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची मतदारसंघात जोरदार चर्चा झाली. देवेंद्र भुयार यांच्या विजयात ही बाबदेखील महत्वाची ठरली, असे मोर्शी मतदारसंघात चर्चिले जात आहे.मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे गतवेळी भाजपने नवखा उमेदवार दिला, तर यंदा उच्चशिक्षित उमेदवार दिला. तथापि, मतदारांनी अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी एकतर्फी विजय मिळविल्याने मेळघाट मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी मेळघाटचे दोनदा भाजपकडून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे राजकुमार पटेल यांनी प्रहार समर्थित अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पटेल यांनी आदिवासी बांधवांसोबत सातत्याने ठेवलेली ‘कनेक्टिव्हिटी’ त्यांच्या विजयासाठी फलदायी ठरली आहे.जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावर बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार व राजकुमार पटेल हे चौघे आमदार म्हणून विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या सिंचन, पाण्याचा प्रश्न, रोजगार, नवीन उद्योगधंदे, शेतमालाला भाव, दिव्यांगाना कायमस्वरूपी रोजगार, रिक्त जागांचा अनुशेष, अचलपूर जिल्हा निर्मिती आदी महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यावर तोडगा काढण्याकडे त्यांना भर द्यावा लागणार आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास ते कसा सार्थ करतात, हे पुढे दिसेलच.सामान्य मतदारांनी दिली साथकधी नव्हे तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार अपक्ष आमदार निवडून आल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. अपक्षांचा विजय हे धक्कातंत्र मानले जात आहे. तथापि, त्यांच्या विजयामागे सामान्य मतदारांची शक्ती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. बडनेरा, मोर्शी, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघांमध्ये सामान्य मतदारांनी अपक्षांच्या पाठीशी बळ उभे केले आहे. रवि राणा, बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या विजयाने मतदारसंघातील समीकरणे नव्याने मांडावी लागतील, तर देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी थेट राज्याच्या कृषिमंत्र्यांना अस्मान दाखविले.

टॅग्स :Amravatiअमरावती