शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; अपक्षांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.

ठळक मुद्देचार अपक्षांनी रचला इतिहासराणांना सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून पसंतीजिल्हा परिषद सदस्य भुयार झाले आमदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांपैकी चार अपक्षांनी काबीज केले. त्यांचा विजय राजकीयदृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू आणि रवि राणा या दोघांनी आपल्या कार्यकाळात चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे यंदा बडनेरा मतदारसंघातून रवि राणा व अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना मतदारांनी पुन्हा कौल दिल्याचे वास्तव आहे. त्यातच यंदा नव्याने दोन अपक्ष मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल व मोर्शीतून देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत ‘एन्ट्री’ मिळविली आहे. जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू हे चौथ्यांदा विजयी झाले. रुग्णसेवा आणि अपंगांची मदत यासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेले बच्चू कडू यांच्या ‘चौकारा’ने जिल्ह्याचे राजकारण पालटून गेले आहे. विजयानंतर मतदारसंघात ‘अपना भिडू बच्चू कडू’ या नाऱ्यांनी आसमंत कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.मोर्शी मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवित असलेले अपक्ष देवेंद्र भुयार यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना धोबीपछाड दिला. जिल्हा परिषद सदस्य असलेले देवेंद्र भुयार हे असून, त्यांची लढवय्या अशी ओळख आहे. मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला. वाहन पेटवून दिले. भुयार यांना किरकोळ जखमा झाल्या होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची मतदारसंघात जोरदार चर्चा झाली. देवेंद्र भुयार यांच्या विजयात ही बाबदेखील महत्वाची ठरली, असे मोर्शी मतदारसंघात चर्चिले जात आहे.मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे गतवेळी भाजपने नवखा उमेदवार दिला, तर यंदा उच्चशिक्षित उमेदवार दिला. तथापि, मतदारांनी अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी एकतर्फी विजय मिळविल्याने मेळघाट मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी मेळघाटचे दोनदा भाजपकडून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे राजकुमार पटेल यांनी प्रहार समर्थित अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पटेल यांनी आदिवासी बांधवांसोबत सातत्याने ठेवलेली ‘कनेक्टिव्हिटी’ त्यांच्या विजयासाठी फलदायी ठरली आहे.जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावर बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार व राजकुमार पटेल हे चौघे आमदार म्हणून विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या सिंचन, पाण्याचा प्रश्न, रोजगार, नवीन उद्योगधंदे, शेतमालाला भाव, दिव्यांगाना कायमस्वरूपी रोजगार, रिक्त जागांचा अनुशेष, अचलपूर जिल्हा निर्मिती आदी महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यावर तोडगा काढण्याकडे त्यांना भर द्यावा लागणार आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास ते कसा सार्थ करतात, हे पुढे दिसेलच.सामान्य मतदारांनी दिली साथकधी नव्हे तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार अपक्ष आमदार निवडून आल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. अपक्षांचा विजय हे धक्कातंत्र मानले जात आहे. तथापि, त्यांच्या विजयामागे सामान्य मतदारांची शक्ती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. बडनेरा, मोर्शी, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघांमध्ये सामान्य मतदारांनी अपक्षांच्या पाठीशी बळ उभे केले आहे. रवि राणा, बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या विजयाने मतदारसंघातील समीकरणे नव्याने मांडावी लागतील, तर देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी थेट राज्याच्या कृषिमंत्र्यांना अस्मान दाखविले.

टॅग्स :Amravatiअमरावती