शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

Maharashtra Election 2019 ; आज सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

जिल्ह्यात आठही मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात डिजिटल वाहने, आश्वासनांची खैरात, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांनी त्यानुसार नियोजन चालविले आहे. निवडणूक आयोगानुसार, १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणूक प्रचार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रचारात वेग आणला असून, निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कॉर्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. मतदान २१ ऑक्टोबर रोजी आहे.जिल्ह्यात आठही मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात डिजिटल वाहने, आश्वासनांची खैरात, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांनी त्यानुसार नियोजन चालविले आहे. निवडणूक आयोगानुसार, १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत.यंदा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी फारच कमी कालावधी मिळाल्याने बहुतांश उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नसल्याची खंत आतापासून व्यक्त होत आहे. अद्यापही काही गावांमध्ये उमेदवार पोहोचलेले नाहीत. त्यामुळे प्रचारातून सुटलेल्या गावांमध्ये १९ नंतर छुप्या प्रचाराचे नियोजन उमेदवारांनी आखले आहे. १९ ऑक्टोबर पूर्वी अशा गावांमध्ये पोहोचून मतदारांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उमेदवारांना स्थानिक नेत्यांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. दुर्गम, अतिदुर्गम, सीमेलगतच्या गावांमध्ये उमेदवार पोहोचले नाहीत. त्यामुळे निदान मतदार यादीच्या रूपाने तरी प्रचार साहित्य, उमेदवार-पक्षाचे नाव मतदारापर्यंत पोहचविण्याची जणू परीक्षा ठरणार आहे. शहरी मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहचणे कठीण नाही. ग्रामीण भागात पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.उमेदवारांनी घेतला प्रचारात वेगमतदारांच्या भेटीगाठी, कॉर्नर सभांना प्राधान्यसायंकाळी प्रचार रॅली, कॉर्नर बैठकींना पसंतीआठही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी दिवसा प्रचारासाठी नकारघंटा चालविली आहे. कारण अलीकडे शेतीची कामे जोरात सुरू असल्याने उमेदवार गावात पोहोचले की, मतदार घरी मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.

टॅग्स :amravati-acअमरावती