शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Maharashtra Election 2019 ; धामणगाव रेल्वे मतदारसंघात ‘लाव रे तो व्हिडीओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : प्रचारसभेत युती सरकारचे वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शेतकरी आत्महत्यांसाठी आघाडी सरकारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपकडून केली जायची. आता त्यांचे सरकार असताना शेतकरी आत्महत्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत. तो धागा हेरून आताचे सत्ताधीश व पाच वर्षांपूर्वीचे तेच विरोधक भूमिकेपासून कसे फिरले, यावर अचूक भाष्य काँगे्रसचे उमेदवार वीरेंद्र जगताप हे व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांपुढे करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य प्रकाशझोतात आले होते. आता आमदार जगताप यांचे ‘तो सूर्य अन् हा जयद्रथ’ गाजत आहे.वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ च्या आधी सत्तेत नसताना कसे बोलायचे आणि सत्तेत आल्यावर ते काय बोलतात, यावर त्यांनी कटाक्ष केला आहे. याच फडणवीस सरकारने सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देऊ, असे आश्वासन दिलेला व्हिडीओ आमच्याकडे आहे. प्रत्यक्षात सोयाबीनला किती भाव आहे, हे मतदार शेतकरी जाणतातच, असे भाष्य करीत जगताप यांनी राज्य सरकारची पोलखोल केली.मतदारांकडूनच घेतात उत्तरेकर्ज माफ झाले काय? शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला काय? स्वामिनाथन आयोग नेमला काय? पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळाले काय? असे प्रश्न घेऊन वीरेंद्र जगताप जनतेसमोर जात आहेत. त्याची उत्तरे जनतेकडूनच घेत आहेत. या प्रचारसभेला पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक सवाई, विनोद चौधरी, सचिन रिठे, विशाल रिठे, अमर कणसे, प्रवीण कुंभलकर, सरफराज खान, समीर दहातोंडे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :dhamangaon-railway-acधामणगाव रेल्वेVirendra Jagtapविरेंद्र जगताप