शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; धामणगाव रेल्वे मतदारसंघात ‘लाव रे तो व्हिडीओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : प्रचारसभेत युती सरकारचे वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शेतकरी आत्महत्यांसाठी आघाडी सरकारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपकडून केली जायची. आता त्यांचे सरकार असताना शेतकरी आत्महत्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत. तो धागा हेरून आताचे सत्ताधीश व पाच वर्षांपूर्वीचे तेच विरोधक भूमिकेपासून कसे फिरले, यावर अचूक भाष्य काँगे्रसचे उमेदवार वीरेंद्र जगताप हे व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांपुढे करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य प्रकाशझोतात आले होते. आता आमदार जगताप यांचे ‘तो सूर्य अन् हा जयद्रथ’ गाजत आहे.वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ च्या आधी सत्तेत नसताना कसे बोलायचे आणि सत्तेत आल्यावर ते काय बोलतात, यावर त्यांनी कटाक्ष केला आहे. याच फडणवीस सरकारने सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देऊ, असे आश्वासन दिलेला व्हिडीओ आमच्याकडे आहे. प्रत्यक्षात सोयाबीनला किती भाव आहे, हे मतदार शेतकरी जाणतातच, असे भाष्य करीत जगताप यांनी राज्य सरकारची पोलखोल केली.मतदारांकडूनच घेतात उत्तरेकर्ज माफ झाले काय? शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला काय? स्वामिनाथन आयोग नेमला काय? पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळाले काय? असे प्रश्न घेऊन वीरेंद्र जगताप जनतेसमोर जात आहेत. त्याची उत्तरे जनतेकडूनच घेत आहेत. या प्रचारसभेला पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक सवाई, विनोद चौधरी, सचिन रिठे, विशाल रिठे, अमर कणसे, प्रवीण कुंभलकर, सरफराज खान, समीर दहातोंडे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :dhamangaon-railway-acधामणगाव रेल्वेVirendra Jagtapविरेंद्र जगताप