शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - युतीला रोखण्यासाठी आघाडीची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनोमीलन झाल्याने नव्या दमाने काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरले आहेत.

ठळक मुद्देरणांगण विधानसभेचे : यशोमती ठाकूर, बच्चू कडू, वीरेंद्र जगताप पुन्हा मैदानात, अमरावतीबाबत औत्सुक्य!

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग तीनवेळा आमदारकी मिळवू शकलेले धामणगाव रेल्वेचे वीरेंद्र जगताप आणि अचलपूरचे बच्चू कडू हे दोन्ही अनुभवी नेते आपापल्या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरले आहेत.तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर, बडनेराचे आमदार रवि राणा, मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांना सलग दोनदा निवडणूक जिंकता आली. आता तिसऱ्यांदा तिघेही मैदानात आहेत. तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख हे अमरावतीतून पुन्हा रिंगणात राहतील.मोदी लाटेत पहिल्यांदाच निवडून आलेले मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर व दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांनाही दुसऱ्यांदा निवडणूक लढायची आहे.यावेळी तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, दर्यापूर व मोर्शी हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला राहणार असल्याची माहिती आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर व चांदूर रेल्वे मतदारसंघात वीरेंद्र जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वाधिक गहजब अमरावती मतदारसंघात आहे. 'स्टँडबाय मोड’वर असलेले माजी आमदार रावसाहेब शेखावत केव्हाही चुप्पी तोडून खळबळ उडवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांच्या उमेदवारीच्या घोषणेने वातावरण तापले आहे.याशिवाय मोर्शी मतदारसंघातही माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख ऐनवेळी उमेदवारीसाठी दावा करतील, अशी शक्यता अनेकांना वाटते. मेळघाटमध्ये माजी आमदार राजकुमार पटेल यांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यासाठी उमेदवारी मागितली जाऊ शकते. काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे भाजपवासी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनुभवी आमदारांना सतर्कतेची यावेळी गरज निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यात युतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बसपा व डाव्या आघाडीचे उमेदवारही दखलपात्र मते घेणार आहेत.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनोमीलन झाल्याने नव्या दमाने काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घालण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच शक्ती पणाला लावली आहे.पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणालापालकमंत्र्यांनी जिल्हाभरातील भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झटणे अपेक्षित आहे; तथापि मतदारसंघात स्थिती अटीतटीची असल्यामुळे पालकमंत्री वरूड, मोर्शीतच अडकून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे विक्रम ठाकरे व शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यामुळे बोंडे यांचे श्रम वाढले आहेत. कृषिमंत्रिपद मिळाल्यावरही शेतकºयांना, संत्राउत्पादकांना आलेली निराशा, ड्रायझोनचा बिकट झालेला मुद्दा आणि बोंडे यांचे अमरावतीकर असणे या मुद्यांवर आतापासूनच उडू लागलेला धुराळा कृषिमंत्री कसा शमवितात, हे बघणे जिल्हावासीयांसाठी रंजक ठरणार आहे.भाजपचा चंग, यशोमतींचा निर्धार!आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे आता प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तिवसा मतदारसंघासोबतच काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे. यशोमतींना रोखायचेच हा भाजपने बांधलेला चंग आणि लढायचे ते जिंकण्यासाठीच हा यशोमतींचा निर्धार निवडणुकीत रंगत आणणारा आहे.एकाच कुटुंबात दोन आमदार?पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर अरुण अडसड यांना विधान परिषदेत आमदार करण्यात आले. नव्या चेहºयाला संधी देण्याऐवजी अडसडांना पुत्रपे्रमाचे भरते आल्यामुळे एकाच घरात दोन आमदार का असावे, असा सवाल आता भाजप कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.खासदार अन् आमदारबडनेरा मतदारसंघाचे दोन वेळा रवि राणा यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तिसºयांदा पुन्हा ते उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या आता अमरावतीच्या खासदार आहेत. एकाच घरात खासदार आणि आमदार असावे काय, या मुद्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष असे की, आनंदराव अडसुळांनी मुलाला आमदार केल्याच्या मुद्यावरून राणा दाम्पत्याने लोकसभेच्या प्रचारात रान उठविले होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019