शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:40 IST

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी यासाठी आयोग आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे. यावेळची विधानसभा निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी. कोणत्याही राजकीय पक्षाने प्रदूषणास कारक पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे नाव मतदार यादीत असणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हधिकाऱ्यांनी केले.निवडणुकीकरिता ५,०६७ बॅलेट युनिट, ३७२६ कंट्रोल युनिट व ३७९० व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व ईव्हीएमची प्रथमस्तर चाचणी ३१ ऑगस्टला पूर्ण झालेली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्राध्यक्ष व प्रत्येक केंद्रावर तीन मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार ५५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. याव्यतिरिक्त ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल यांचेही सहकार्य निवडणुकीत राहणार आहे. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक कुमक तैनात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात जिल्हालगतच्या चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. सर्व मतदारसंघांत एक-दोन दिवसात फ्लाइंग स्कॉड व सर्व पथकांचे गठण व आचारसंहितेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही मतदारसंघ मुख्यालयी ‘आरओ’ स्तरावर होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, एमसीएमसी समितीचे हर्षवर्धन पवार उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करणारआयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून आठही मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत बहुतांश पदाधिकाऱ्यांची वाहन जमा होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय ४८ तासांच्या आत सार्वजनिक ठिकाणी लागलेली राजकीय फलके, होर्डिंग काढण्यात येणार आहेत. मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही बाब करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.खर्चाची मर्यादा २८ लाखविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांची आहे व या मर्यादेच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्च करावा लागणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, व्हीओओ पथके राहणार आहेत तसेच सर्व सीमांवर चेक पोस्ट राहणार आहेत. आयोगाचे अ‍ॅपदेखील या निवडणुकीत कार्यान्वित राहील. याव्यतिरिक्त १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना तक्रार करता येणार आहे. २४ महिला केंद्रे राहतील. १० संवेदनशील केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

निवडणूक कार्यक्रमअधिसूचना प्रसिद्धी२७ सप्टेंबरउमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक४ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज छाननी५ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज माघार७ ऑक्टोबरमतदान२१ ऑक्टोबरमतमोजणी२४ ऑक्टोबर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019