शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:40 IST

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी यासाठी आयोग आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे. यावेळची विधानसभा निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी. कोणत्याही राजकीय पक्षाने प्रदूषणास कारक पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे नाव मतदार यादीत असणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हधिकाऱ्यांनी केले.निवडणुकीकरिता ५,०६७ बॅलेट युनिट, ३७२६ कंट्रोल युनिट व ३७९० व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व ईव्हीएमची प्रथमस्तर चाचणी ३१ ऑगस्टला पूर्ण झालेली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्राध्यक्ष व प्रत्येक केंद्रावर तीन मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार ५५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. याव्यतिरिक्त ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल यांचेही सहकार्य निवडणुकीत राहणार आहे. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक कुमक तैनात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात जिल्हालगतच्या चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. सर्व मतदारसंघांत एक-दोन दिवसात फ्लाइंग स्कॉड व सर्व पथकांचे गठण व आचारसंहितेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही मतदारसंघ मुख्यालयी ‘आरओ’ स्तरावर होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, एमसीएमसी समितीचे हर्षवर्धन पवार उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करणारआयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून आठही मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत बहुतांश पदाधिकाऱ्यांची वाहन जमा होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय ४८ तासांच्या आत सार्वजनिक ठिकाणी लागलेली राजकीय फलके, होर्डिंग काढण्यात येणार आहेत. मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही बाब करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.खर्चाची मर्यादा २८ लाखविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांची आहे व या मर्यादेच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्च करावा लागणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, व्हीओओ पथके राहणार आहेत तसेच सर्व सीमांवर चेक पोस्ट राहणार आहेत. आयोगाचे अ‍ॅपदेखील या निवडणुकीत कार्यान्वित राहील. याव्यतिरिक्त १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना तक्रार करता येणार आहे. २४ महिला केंद्रे राहतील. १० संवेदनशील केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

निवडणूक कार्यक्रमअधिसूचना प्रसिद्धी२७ सप्टेंबरउमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक४ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज छाननी५ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज माघार७ ऑक्टोबरमतदान२१ ऑक्टोबरमतमोजणी२४ ऑक्टोबर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019