शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजला दणका नव्याने देणार बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले.

ठळक मुद्देशासनाची दखल : सोयाबीनची उगवण नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाबीजच्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांची उगवण नसल्याची तक्रार असलेल्या शेतकऱ्यांना परत बियाणे मिळणार आहे. शासनाने तसे आदेश महाबीजला दिले आहेत. बियाण्यांचा स्टॉक संपल्यास त्यांना धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. याविषयी धोरण ठरविण्यात येणार आहे. यासंदर्भात महाबीजचे प्रादेशिक व्यवस्थापक बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले.जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले. महाबीज बियाणेसंदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्याची तत्काळ दखल घेऊन तालुकास्तरीय समितीच्या अहवालाची वाट न पाहता, बियाणे बदलून देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांचा परतावा सोयाबीन बियाण्यांद्वारे देण्यात येण्यात येणार आहे. अकोला, वाशिम, हिंगोली येथील महाबीजच्या गोदामात असलेले बियाणे या ठिकाणी मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी जेथून खरेदी केले, तेथेच द्यायचे की कसे, याविषयी उपलब्ध बियाणे व तक्रारी याची सांगड घालण्यात येऊन धोरण ठरविण्यात येत आहे. उपलब्ध बियाणे संपल्यानंतर धनादेशाद्वारे रक्कम देण्यात येण्यात असल्याची माहिती महाबीजद्वारे देण्यात आली.कॉमन लॉटमध्ये तक्रारी जास्तमहाबीजच्या कॉमन लॉटमध्ये उगवणशक्तीच्या तक्रारी जास्त आहेत व हे सर्व बियाणे विकले गेले आहेत. महाबीजच्या जे-३३५ मध्ये ६०२४ व २५२ या लॉटमध्ये व ९५२३ मध्ये ५९ व ५ या लॉटमध्ये उगवणशक्ती नसल्याच्या तक्रारी जास्त आहेत. नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात २५२ लॉटमधील बियाणे विकले गेले, तर चांदूर बाजार तालुक्यात ५९ व ५ या लॉटमधील बियाणे विकले गेले. याव्यतिरिक्त आणखी चार ते पाच लॉटसाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले.प्रमाणीकरणानंतर बियाणे खराब का?राज्य शासनाद्वारे बियाण्यांचे प्रमाणीकरण करण्यात आलेले असताना, उगवणशक्ती का नाही की यामध्येही घोळ आहे, असा शेतकºयांचा सवाल आहे. लॉट पासिंग करताना बियाणे ओले असल्याचीच शक्यता आहे. त्यामुळे फंगस चढल्याने उगवणशक्ती कमी झाली. याव्यतिरिक्त आणखी काही कारणेदेखील आहेत. बियाणे राज्य शासनाच्या एजन्सीद्वारे प्रमाणित करण्यात आल्यानंतरच महाबीजद्वारे विक्री करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बियाण्यांची पेरणी झाल्यानंतर उगवणशक्ती नसल्याची बाब उघड झाली आहे.उगवण न झालेल्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारदार शेतकºयांना परत बियाणे देण्यात येणार आहे. बियाणे उपलब्ध न झाल्यास धनादेश देण्यात येतील. याविषयी शासनाचे पत्र प्राप्त आहे.- एस.पी. देशमुख, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

टॅग्स :Mahabeejमहाबीज