शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लोणीचा ऋषिबाबा प्रकल्प १४ वर्षांपासून तहानलेलाच

By admin | Updated: September 2, 2015 00:06 IST

आलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम मागील १४ वर्षांपासून सुरु आहे.

त्रिनयन मालपे लोणीआलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम मागील १४ वर्षांपासून सुरु आहे. यामुळे सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून सदर प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत. केवळ दफ्तरदिरंगाई आणि ठेकेदारांच्या लेटलतीफीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २००२ मध्ये लोणीनजीक आलोडा शिवारात ऋृषीबाबा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. याकरिता ३ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर झाले. ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्प लोणी परिसरातील शेतीसाठी पूरक ठरणारा आहे. याकरिता ६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रासाठी अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीच्या ८० टक्के शेतमालकांनी २००४ मध्ये अनेकवेळा पाठपुरावा केल्याने शासनाने निर्णयानुसार मोबदला दिला. मात्र २० टक्के शेतकरी प्रकल्पग्रसांना अद्यापही मदत मिळाली नाही. वाढीव मोबदला बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही. या प्रकल्पाची उंची ९१.७० मीटर असून भिंतीची लांबी १,४५० मीटर आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाझराचा लाभ मिळणार आहे. यातून काढण्यात येणाऱ्या कालव्यामुळे लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. हा प्रकल्प फायदेशीर असल्याने तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी पाठपुरावा करुन हा प्रकल्प मंजूर करवून आणला होता. या प्रकल्पाला पाणी कमी पडू नये म्हणून भविष्यातील नियोजन केले होते. यामध्ये वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कालव्यातून बेनोडा येथील धवलगिरी नदीत सोडून ते धवलगिरी नदीतून या प्रकल्पात सोडण्याचा बेत होता. परंतु सत्तांतरे झाले. आता विद्यमान आमदारांनी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर अनेक प्रकल्प निधीअभावी रखडतील. कोट्यवधी रुपयांचा शासनाचा या प्रकल्पावर खर्च होऊनही प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न चिंतेचा विषय आहे. कोट्यवधींचा खर्च होऊन ऋषिबाबा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असून १४ वर्षांनंतरही तहानलेलाच आहे.