शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

लोणीचा ऋषिबाबा प्रकल्प १४ वर्षांपासून तहानलेलाच

By admin | Updated: September 2, 2015 00:06 IST

आलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम मागील १४ वर्षांपासून सुरु आहे.

त्रिनयन मालपे लोणीआलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम मागील १४ वर्षांपासून सुरु आहे. यामुळे सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून सदर प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत. केवळ दफ्तरदिरंगाई आणि ठेकेदारांच्या लेटलतीफीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २००२ मध्ये लोणीनजीक आलोडा शिवारात ऋृषीबाबा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. याकरिता ३ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर झाले. ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्प लोणी परिसरातील शेतीसाठी पूरक ठरणारा आहे. याकरिता ६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रासाठी अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीच्या ८० टक्के शेतमालकांनी २००४ मध्ये अनेकवेळा पाठपुरावा केल्याने शासनाने निर्णयानुसार मोबदला दिला. मात्र २० टक्के शेतकरी प्रकल्पग्रसांना अद्यापही मदत मिळाली नाही. वाढीव मोबदला बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही. या प्रकल्पाची उंची ९१.७० मीटर असून भिंतीची लांबी १,४५० मीटर आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाझराचा लाभ मिळणार आहे. यातून काढण्यात येणाऱ्या कालव्यामुळे लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. हा प्रकल्प फायदेशीर असल्याने तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी पाठपुरावा करुन हा प्रकल्प मंजूर करवून आणला होता. या प्रकल्पाला पाणी कमी पडू नये म्हणून भविष्यातील नियोजन केले होते. यामध्ये वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कालव्यातून बेनोडा येथील धवलगिरी नदीत सोडून ते धवलगिरी नदीतून या प्रकल्पात सोडण्याचा बेत होता. परंतु सत्तांतरे झाले. आता विद्यमान आमदारांनी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर अनेक प्रकल्प निधीअभावी रखडतील. कोट्यवधी रुपयांचा शासनाचा या प्रकल्पावर खर्च होऊनही प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न चिंतेचा विषय आहे. कोट्यवधींचा खर्च होऊन ऋषिबाबा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असून १४ वर्षांनंतरही तहानलेलाच आहे.