शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

वरुडात कमी दाबाचा विद्युत पुरवठा

By admin | Updated: November 15, 2015 00:13 IST

तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत.

शेतकरी त्रस्त : अनेकांची विद्युत उपकरणे जळालीवरूड : तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत. त्यातच लोडशेडींगच्या नावाखाली विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्याने ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. खरिपाबरोबर रबी पीक व संत्रा बहर हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. भारनियमनात शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी दररोज सहा तासच वीज पुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस पूर्णत: २४ तास विद्युत पुरवठा बंद असतो. उर्वरित सहा दिवसात रोज केवळ सहा तास शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळते. यातील तीन दिवस व उर्वरित तीन दिवस रात्री दीड वाजल्यानंतर विजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा दिवसांत फक्त २४ तास वीज मिळते. आठवड्याला मिळणाऱ्या या २४ तास विजेपैैैकी सर्व दुरपर्यंत चार तास या ना त्या कारणाने वीजपुरवठा बंद असतो. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २० तासच विद्युत पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. हा वीजपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होतो. या कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांची विहिवरील विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. त्यामुळे विद्युत संच जळून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुरूस्तीचा पाच ते आठ हजारांचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरीप हंगामातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. कापूस व संत्रा पिकांवर शेतकऱ्यांच्या थोड्याफार आशा आहे. परंतु महावितरणाने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीनमुळे खचलेला शेतकरी रबी पिकाचे नियोजन करीत आहे. अशावेळी विजेअभावी पाणी मिळत नसल्याने रबीचे पीकही हातचे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रेकडाऊनच्या नावाखाली दिवसाच्यावेळी तासनतास विजपुरवठा खंडित केला जातो. वीज कंपनीने वेळीच या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)