शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

वरुडात कमी दाबाचा विद्युत पुरवठा

By admin | Updated: November 15, 2015 00:13 IST

तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत.

शेतकरी त्रस्त : अनेकांची विद्युत उपकरणे जळालीवरूड : तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत. त्यातच लोडशेडींगच्या नावाखाली विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्याने ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. खरिपाबरोबर रबी पीक व संत्रा बहर हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. भारनियमनात शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी दररोज सहा तासच वीज पुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस पूर्णत: २४ तास विद्युत पुरवठा बंद असतो. उर्वरित सहा दिवसात रोज केवळ सहा तास शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळते. यातील तीन दिवस व उर्वरित तीन दिवस रात्री दीड वाजल्यानंतर विजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा दिवसांत फक्त २४ तास वीज मिळते. आठवड्याला मिळणाऱ्या या २४ तास विजेपैैैकी सर्व दुरपर्यंत चार तास या ना त्या कारणाने वीजपुरवठा बंद असतो. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २० तासच विद्युत पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. हा वीजपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होतो. या कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांची विहिवरील विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. त्यामुळे विद्युत संच जळून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुरूस्तीचा पाच ते आठ हजारांचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरीप हंगामातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. कापूस व संत्रा पिकांवर शेतकऱ्यांच्या थोड्याफार आशा आहे. परंतु महावितरणाने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीनमुळे खचलेला शेतकरी रबी पिकाचे नियोजन करीत आहे. अशावेळी विजेअभावी पाणी मिळत नसल्याने रबीचे पीकही हातचे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रेकडाऊनच्या नावाखाली दिवसाच्यावेळी तासनतास विजपुरवठा खंडित केला जातो. वीज कंपनीने वेळीच या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)