शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार जागांवर कमळ फुलले

By admin | Updated: October 19, 2014 23:12 IST

नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज

अमरावती : नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज करुन ‘अच्छे दिन’ आल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही, हे विशेष.१५ आॅक्टोबर रोजी मतदान आटोपताच कोण विजयी होणार, याविषयी तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, रविवारी मतमोजणी सुरु होताच पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. एकमात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची लढत राहिली. अखेर जगताप यांचा ९७४ मतांनी निसटता विजय झाला. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान यशोमतींना विरोधकांनी लक्ष्य केले. मात्र, त्यांनी विकास कामांच्या भरवशावर दुसऱ्यांदा विजय खेचून आणला. मतदान आटोपताच काँग्रेसच्या एकमात्र यशोमती ठाकूर निवडून येतील, असा अंदाज बांधला गेला होता.युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्यात. मात्र शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. याउलट भाजपने चार जागा काबीज करुन हिंदुत्ववादी विचारसरणीची मते एकवटण्यात यश मिळविले. मोर्शी व बडनेऱ्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु दर्यापूर, मेळघाट, धामणगाव, तिवसा, अमरावती व अचलपुरात सेनेचे उमेदवार तिसऱ्या, चवथ्या क्रमांकावर राहिलेत. गत विधानसभा निवडणुकीत खाते न उघडणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळीही भोपळ्यावरच समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळीही बच्चू कडू, रवी राणा हे दोन्ही अपक्ष उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. मनसेचे तिवसा, धामणगाव, दर्यापूर, मोर्शी, अचलपुरात इंजिन धावले नाही. रिपाइं (गवई गट) ने दर्यापूर, तिवसा, अचलपूर व अमरावतीत उमेदवार उभे केले. मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बसपने जिल्ह्यात आठही जागांवर उमेदवार उभे करुन खाते उघडण्याची धडपड चालविली परंतु अपयश आले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसला दोन जागांचे नुकसान झाले आहे. शिवसेनेकडे असलेली एक जागाही सांभाळता आली नाही.