शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

यंदा भरपूर आमरस; केशर १५० रुपये किलो तर हापूस ५०० रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात ...

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरीचा देवगड, गुजरात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे; परंतु कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. संचारबंदीच्या कठोर निर्बंधामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.

यंदा रत्नगिरीचा हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत २०० रुपये दराला विक्री करण्यात येत आहे. कर्नाटकचा केशर १५० रुपये, बैगपल्ली ५०, तर गुजरातचे केशर आंबे हे १०० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता; परंतु यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्याचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.

आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अमरावती शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

बॉक्स पॉईंटर

मागील वर्षीचे दर

हापूस ६०० ते १००० रुपये डझन.

बैगनपल्ली ८० ते १०० रुपये किलो.

केशर २०० रुपये किलो.

--------

बॉक्स पॉईंटर

होलसेल रिटेल किंमत

केशर : १०० ते १२०

बैगनपल्ली : ६० ते ७०

हापूस: ५०० ते ९००

बॉक्स

आवक वाढती, ग्राहक रोडावलेले

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नगिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबे घेऊन येत आहेत; परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केली जात आहे; परंतु ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. लॉकडाऊनमुळे मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.

कोट

मागील वर्षी आंब्याला चांगली मागणी होती. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात आला आहे; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. खरेदी केलेला आंबा सडून जात आहे.

- मोहम्मद युनूस, आंबा व्यापारी.

रत्नागिरी तसेच कर्नाटक येथून यंदा आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. वाहतूक खर्च आणि इतर मजुरीसह खूप खर्च झाला; परंतु अमरावतीत आल्यानंतर आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही आणि हवा तेवढा भावही मिळत नाही. ग्राहकही भाव तोडून मागत आहेत, त्यामुळे यंदा विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

- प्रल्हाद देशमुख, व्यापारी.

कोट

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर, मेळघाटात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. यंदा आंबा चांगला आला आहे; परंतु लग्नसराई यासह पाहुण्यांचे जाणे-येणे बंद असल्याने आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे उतरविलेल्या आंब्याचे करायचे काय?

- गणेश राठोड, काटकुंभ, शेतकरी.

दरवर्षी व्यापारी आंबा नेण्यासाठी मागे लागत होते; परंतु यंदा कोरोनामुळे मोजकेच व्यापारी खरेदीसाठी आले. त्यातही मागणी नसल्यामुळे ते भाव पाडून मागत आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.

- रामदास बचे, गौरखेडा कुंभी, शेतकरी.