शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर आमरस; केशर १५० रुपये किलो तर हापूस ५०० रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात ...

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरीचा देवगड, गुजरात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे; परंतु कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. संचारबंदीच्या कठोर निर्बंधामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.

यंदा रत्नगिरीचा हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत २०० रुपये दराला विक्री करण्यात येत आहे. कर्नाटकचा केशर १५० रुपये, बैगपल्ली ५०, तर गुजरातचे केशर आंबे हे १०० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता; परंतु यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्याचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.

आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अमरावती शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

बॉक्स पॉईंटर

मागील वर्षीचे दर

हापूस ६०० ते १००० रुपये डझन.

बैगनपल्ली ८० ते १०० रुपये किलो.

केशर २०० रुपये किलो.

--------

बॉक्स पॉईंटर

होलसेल रिटेल किंमत

केशर : १०० ते १२०

बैगनपल्ली : ६० ते ७०

हापूस: ५०० ते ९००

बॉक्स

आवक वाढती, ग्राहक रोडावलेले

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नगिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबे घेऊन येत आहेत; परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केली जात आहे; परंतु ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. लॉकडाऊनमुळे मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.

कोट

मागील वर्षी आंब्याला चांगली मागणी होती. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात आला आहे; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. खरेदी केलेला आंबा सडून जात आहे.

- मोहम्मद युनूस, आंबा व्यापारी.

रत्नागिरी तसेच कर्नाटक येथून यंदा आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. वाहतूक खर्च आणि इतर मजुरीसह खूप खर्च झाला; परंतु अमरावतीत आल्यानंतर आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही आणि हवा तेवढा भावही मिळत नाही. ग्राहकही भाव तोडून मागत आहेत, त्यामुळे यंदा विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

- प्रल्हाद देशमुख, व्यापारी.

कोट

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर, मेळघाटात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. यंदा आंबा चांगला आला आहे; परंतु लग्नसराई यासह पाहुण्यांचे जाणे-येणे बंद असल्याने आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे उतरविलेल्या आंब्याचे करायचे काय?

- गणेश राठोड, काटकुंभ, शेतकरी.

दरवर्षी व्यापारी आंबा नेण्यासाठी मागे लागत होते; परंतु यंदा कोरोनामुळे मोजकेच व्यापारी खरेदीसाठी आले. त्यातही मागणी नसल्यामुळे ते भाव पाडून मागत आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.

- रामदास बचे, गौरखेडा कुंभी, शेतकरी.