शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

यंदा भरपूर आमरस; केशर १५० रुपये किलो तर हापूस ५०० रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात ...

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरीचा देवगड, गुजरात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे; परंतु कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. संचारबंदीच्या कठोर निर्बंधामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.

यंदा रत्नगिरीचा हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत २०० रुपये दराला विक्री करण्यात येत आहे. कर्नाटकचा केशर १५० रुपये, बैगपल्ली ५०, तर गुजरातचे केशर आंबे हे १०० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता; परंतु यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्याचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.

आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अमरावती शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

बॉक्स पॉईंटर

मागील वर्षीचे दर

हापूस ६०० ते १००० रुपये डझन.

बैगनपल्ली ८० ते १०० रुपये किलो.

केशर २०० रुपये किलो.

--------

बॉक्स पॉईंटर

होलसेल रिटेल किंमत

केशर : १०० ते १२०

बैगनपल्ली : ६० ते ७०

हापूस: ५०० ते ९००

बॉक्स

आवक वाढती, ग्राहक रोडावलेले

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नगिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबे घेऊन येत आहेत; परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केली जात आहे; परंतु ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. लॉकडाऊनमुळे मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.

कोट

मागील वर्षी आंब्याला चांगली मागणी होती. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात आला आहे; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. खरेदी केलेला आंबा सडून जात आहे.

- मोहम्मद युनूस, आंबा व्यापारी.

रत्नागिरी तसेच कर्नाटक येथून यंदा आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. वाहतूक खर्च आणि इतर मजुरीसह खूप खर्च झाला; परंतु अमरावतीत आल्यानंतर आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही आणि हवा तेवढा भावही मिळत नाही. ग्राहकही भाव तोडून मागत आहेत, त्यामुळे यंदा विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

- प्रल्हाद देशमुख, व्यापारी.

कोट

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर, मेळघाटात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. यंदा आंबा चांगला आला आहे; परंतु लग्नसराई यासह पाहुण्यांचे जाणे-येणे बंद असल्याने आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे उतरविलेल्या आंब्याचे करायचे काय?

- गणेश राठोड, काटकुंभ, शेतकरी.

दरवर्षी व्यापारी आंबा नेण्यासाठी मागे लागत होते; परंतु यंदा कोरोनामुळे मोजकेच व्यापारी खरेदीसाठी आले. त्यातही मागणी नसल्यामुळे ते भाव पाडून मागत आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.

- रामदास बचे, गौरखेडा कुंभी, शेतकरी.