शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

अपूर्ण रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:53 IST

तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देखरडून गेलेल्या शेताचे सर्वेक्षण केव्हा ?: पळसखेडच्या शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पळसखेड येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात सोमवार व मंगळवारी तालुक्यात धुंवाधार पाऊस झाला. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी व गावातील नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे, सावंगी संगम शिवारातील शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही चांगले उगवले. मात्र उगवलेले शेतातील  सोयाबीन, तुर, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वारूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाकडून अजून पर्यंत नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्याने सर्वेक्षण करून शासनाने मदत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे रायगड प्रलकपाच्या कामाला चार वर्षांआधी सुरुवात झाली. पण, अद्याप प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. कधी शासनाकडे पैसा नसतो, तर कधी या प्रकल्पाचे कंत्राटदार बदलतात. यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळत चालले आहे. वारंवार कंत्राटदार बदलत चालल्याने त्या कामाच्या प्रतवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत बांधण्याचे काम सुरू झाले व राईगुई नदीच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत मोठमोठ्या भिंती उभारल्या. दरवर्षी या नदीला चांगले पाणी असते. महापूरही येतात. मात्र, आता या नदीच्या दोन्ही कडेला भिंत बांधल्याने जमा झालेले पाणी एकाच मार्गाने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने भिंतीलगतच्या शेती व समोरील गावातील शेती खरडून जात आहे. दोन वर्षांपासून चांगली जमीन या पुरामुळे पडीक राहत अल्याचे सावंगी संगम, एकपाळा या गावातील शेतकऱ्यांची ओरड आहे.रायगड प्रकल्प बंद असल्सामुळे जमीन खरडलीरायगड प्रकल्प बंद पडल्यामुळे धरणातील साचलेले पाणी एकाच ठिकावरून वाहत असल्याने जमीन खरडून गेली व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्याने नदीचे बांध फुटले. ते बांध जर वेळेत बांधले नाही तर आणखी नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी वासुदेव काळमेघ यांनी दिली.कृषी विभागाकडून बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचेकृषी विभागाकडून जे बंधारे बांधण्यात आले, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याची मी कृषी विभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. पण, त्याची दखल कुणीही घेतली नाही. तेच बंधारे फुटले आणि तेथून शेतात पाणी शिरल्याने आमचे सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली आले, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी दिनेश जवळकर यांनी दिली.