शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अपूर्ण रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:53 IST

तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देखरडून गेलेल्या शेताचे सर्वेक्षण केव्हा ?: पळसखेडच्या शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पळसखेड येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात सोमवार व मंगळवारी तालुक्यात धुंवाधार पाऊस झाला. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी व गावातील नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे, सावंगी संगम शिवारातील शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही चांगले उगवले. मात्र उगवलेले शेतातील  सोयाबीन, तुर, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वारूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाकडून अजून पर्यंत नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्याने सर्वेक्षण करून शासनाने मदत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे रायगड प्रलकपाच्या कामाला चार वर्षांआधी सुरुवात झाली. पण, अद्याप प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. कधी शासनाकडे पैसा नसतो, तर कधी या प्रकल्पाचे कंत्राटदार बदलतात. यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळत चालले आहे. वारंवार कंत्राटदार बदलत चालल्याने त्या कामाच्या प्रतवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत बांधण्याचे काम सुरू झाले व राईगुई नदीच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत मोठमोठ्या भिंती उभारल्या. दरवर्षी या नदीला चांगले पाणी असते. महापूरही येतात. मात्र, आता या नदीच्या दोन्ही कडेला भिंत बांधल्याने जमा झालेले पाणी एकाच मार्गाने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने भिंतीलगतच्या शेती व समोरील गावातील शेती खरडून जात आहे. दोन वर्षांपासून चांगली जमीन या पुरामुळे पडीक राहत अल्याचे सावंगी संगम, एकपाळा या गावातील शेतकऱ्यांची ओरड आहे.रायगड प्रकल्प बंद असल्सामुळे जमीन खरडलीरायगड प्रकल्प बंद पडल्यामुळे धरणातील साचलेले पाणी एकाच ठिकावरून वाहत असल्याने जमीन खरडून गेली व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्याने नदीचे बांध फुटले. ते बांध जर वेळेत बांधले नाही तर आणखी नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी वासुदेव काळमेघ यांनी दिली.कृषी विभागाकडून बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचेकृषी विभागाकडून जे बंधारे बांधण्यात आले, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याची मी कृषी विभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. पण, त्याची दखल कुणीही घेतली नाही. तेच बंधारे फुटले आणि तेथून शेतात पाणी शिरल्याने आमचे सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली आले, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी दिनेश जवळकर यांनी दिली.