शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:53 IST

तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देखरडून गेलेल्या शेताचे सर्वेक्षण केव्हा ?: पळसखेडच्या शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पळसखेड येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात सोमवार व मंगळवारी तालुक्यात धुंवाधार पाऊस झाला. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी व गावातील नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे, सावंगी संगम शिवारातील शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही चांगले उगवले. मात्र उगवलेले शेतातील  सोयाबीन, तुर, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वारूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाकडून अजून पर्यंत नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्याने सर्वेक्षण करून शासनाने मदत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे रायगड प्रलकपाच्या कामाला चार वर्षांआधी सुरुवात झाली. पण, अद्याप प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. कधी शासनाकडे पैसा नसतो, तर कधी या प्रकल्पाचे कंत्राटदार बदलतात. यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळत चालले आहे. वारंवार कंत्राटदार बदलत चालल्याने त्या कामाच्या प्रतवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत बांधण्याचे काम सुरू झाले व राईगुई नदीच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत मोठमोठ्या भिंती उभारल्या. दरवर्षी या नदीला चांगले पाणी असते. महापूरही येतात. मात्र, आता या नदीच्या दोन्ही कडेला भिंत बांधल्याने जमा झालेले पाणी एकाच मार्गाने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने भिंतीलगतच्या शेती व समोरील गावातील शेती खरडून जात आहे. दोन वर्षांपासून चांगली जमीन या पुरामुळे पडीक राहत अल्याचे सावंगी संगम, एकपाळा या गावातील शेतकऱ्यांची ओरड आहे.रायगड प्रकल्प बंद असल्सामुळे जमीन खरडलीरायगड प्रकल्प बंद पडल्यामुळे धरणातील साचलेले पाणी एकाच ठिकावरून वाहत असल्याने जमीन खरडून गेली व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्याने नदीचे बांध फुटले. ते बांध जर वेळेत बांधले नाही तर आणखी नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी वासुदेव काळमेघ यांनी दिली.कृषी विभागाकडून बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचेकृषी विभागाकडून जे बंधारे बांधण्यात आले, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याची मी कृषी विभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. पण, त्याची दखल कुणीही घेतली नाही. तेच बंधारे फुटले आणि तेथून शेतात पाणी शिरल्याने आमचे सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली आले, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी दिनेश जवळकर यांनी दिली.