लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात रविवारी सायंकाळी सुसाट वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींच्या पिकाचे नुकसान केले. यात सर्वाधिक फटका संत्रा, कांदा या पिकांना बसला. तालुका कृषी अधिकारी यांच्या प्राथमिक अहवालानुसार, १४ हजार २९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक १३ हजार ६३४ हेक्टरवरील संत्रापिकांचे नुकसान झाले आहे. १३४ गावांना या वादळी पावसाचा फटका बसला.आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गारपीट व दमदार पावसामुळे कांदा, संत्रा, गहू पिकासह भाजीपाला पिकेही पूर्णत: मातीमोल झाली. तालुक्यात चांदूर बाजार मंडळात ४८ मिमी, ब्राह्मणवाडा थडी मंडळ १५ मिमी, आसेगाव मंडळात १४ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात १९ मिमी, बेलोरा मंडळात ४० मिमी व तळेगाव मोहना मंडळात ३६ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात सरासरी २६.८ मिमी पाऊस झाला. चांदूर बाजार मंडळात सर्वाधिक पाऊस पडला आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी ना. बच्चू कडू बांधावर पोहचले होते. कारंजा बहिरम, तुळजापूर गढी शिवारात जाऊन नुकसानाची पाहणी त्यांनी केली. तहसीलदार उमेश खोडके यांना दूरध्वनीवरून तत्काळ नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
चांदूर बाजार तालुक्यात १४ हजार हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गारपीट व दमदार पावसामुळे कांदा, संत्रा, गहू पिकासह भाजीपाला पिकेही पूर्णत: मातीमोल झाली.
चांदूर बाजार तालुक्यात १४ हजार हेक्टरचे नुकसान
ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान संत्र्यांचे : १३४ गावांना वादळी पावसाचा फटका