शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

सत्ताधीशांची बेअब्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:58 PM

तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय पद्धतीचा पुरस्कार करण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे.

ठळक मुद्देकलोतींनी फिरविला निर्णय : एकल कंत्राटाने भाजपमधील अंतर्गत वाद उघड

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय पद्धतीचा पुरस्कार करण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे.स्थायी समिती सभापती विवेक कलोती यांनी २५ मे रोजीच्या स्थायीच्या बैठकीत दैनंदिन स्वच्छतेचे १५० कोटींचे कंत्राट रद्द केले. आता जूनच्या आमसभेत त्यावर अंतिम निर्णय होईल तेव्हा माजी स्थायी सभापती तुषार भारतीय आणि एकल कंत्राटाचे अन्य पुरस्कर्ते नेमकी कुठली भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, एकल कंत्राट रद्द केल्याचा दावा कलोती करीत असले तरी त्यात फारसा दम नाही. ज्यावेळी तुषार भारतीय यांनी एकल कंत्राटाचा प्रयोग राबविण्यासाठी स्थायीत प्रस्ताव आणला, त्याच वेळी कलोतींचा या प्रयोगाला विरोध होता. भाजपमधील अनेकांना ते पटलेले नव्हते. स्वच्छता कंत्राटदारांची मोनोपॉली मोडून काढण्यासाठी भारतीय यांनी या नव्या कंत्राट पद्धतीचा जोरदार पाठपुरावा केला. एवढेच काय तर भाजपच्या सर्व सदस्यांचे समर्थन मिळवून आमसभेत एकल कंत्राटाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेतला. त्यासाठी निविदाप्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया वर्षभर निर्णयात अडकून ठेवण्यात आली आणि कंत्राट रद्द करून पुन्हा प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आला.कलोतींच्या निर्णयाने भारतीय नव्हे, तर भाजपची भूमिका चुकीची ठरविली गेली. शहर भाजपमध्ये आ. सुनील देशमुख आणि तुषार भारतीय यांना मानणारे दोन स्वतंत्र गट आहेत. त्यात आता विवेक कलोती यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे, १६ सदस्यीय स्थायी समितीतील भाजप सदस्यांनी भारतीय यांच्या भूमिकेचा जोरदार पुरस्कार केला होता. त्यातील आशिष अतकरे, चंद्रकांत बोमरे हे क्रियाशील सदस्य स्थायीत विराजमान आहेत. भारतीय ‘माजी’ होताच त्यांनीही कालपरवाच्या स्थायीत कलोतींच्या निर्णयाला विरोध दर्शविला नाही. यावरून भाजपमधील कोणता सदस्य कुणाकडे झुकतोय, हे स्पष्ट झाले आहे. एकल कंत्राटाचा निर्णय एकट्या भारतीय यांचा नव्हता; तो भाजपचा सांघिक निर्णय होता. त्यासाठी किमान भाजप सदस्यांनी एकजूट दाखवावी, असे फर्मान आल्याने बाळासाहेब भुयार, धीरज हिवसे यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. आता भाजपचा तो सांघिक निर्णय कलोतींनी बदलल्याने पक्षातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे.प्रशासनाची कोंडीएकल कंत्राट रद्द करून जुनीच पद्धत अवलंबवायची होती, तर सत्ताधीशांनी त्याबाबतचा निर्णय वर्षभर का प्रलंबित ठेवला? स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवरून प्रशासनावर आगपाखड होत असताना आणि कंत्राटदार उपकारासारखे काम करीत असताना, सत्ताधीशांनी वेगळा असा कोणता निर्णय घेतला, असा प्रश्न प्रशासनातून उपस्थित करण्यात आला आहे.