शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By admin | Updated: July 23, 2016 00:40 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांच्या माथी सुनील देशपांडे अचलपूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. प्रामाणिक ग्राहकांना त्याची झळ मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांमुळे अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील बहुतांशी गावात वीज चोरी होत असते. ज्या ज्या वेळी भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली, त्यावेळी वीज चोरांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आली असल्यामुळे ही वीज चोरी काही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. वीज चोरी हे वीज गळतीचे मुख्य कारण असल्याचे कंपनीचे काही अधिकारी ग्राहक वर्गास सांगत असतात. प्राप्त होणाऱ्या एकूण विजेपैकी १५ टक्के वीज गळती (टॉलरन्स) मान्य करण्यात आली आहे. १५ टक्केपर्यंत वीज गळती असल्यास त्याचा अधिभार ग्राहकांवर लावता येत नाही. परंतु सद्यस्थितीत गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून गळतीची रक्कम नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून पठाणी पद्धतीने वसूल केले जात आहे. अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील काही ग्राहकांकडे अजूनही जुने मीटर आहेत, तर काही ग्राहकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अ‍ॅटजेस्टमेंट केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार काही ग्राहकांना विजेचे मीटर दिलेले असून त्यांचा नियमित वापर सुरू असला तरी तो रेकॉर्डवर नाही. अशा ग्राहकांचा भुर्दंड नियमित देयके भरणाऱ्या ग्राहकांकडून कंपनी वसूल करीत आहेत. कालांतराने रेकॉर्डवर आल्यानंतर त्या वीज ग्राहकांकडून सुद्धा वीज गळतीपोटी वीज वापरापोटीची रक्कम दंडासह वसूल केल्या जाते. एकाच कारणासाठी तब्बल दोनदा वीज वितरण कंपनी पैसे वसूल करीत आहे. या सर्व बाबी संतापजनक असून ग्राहकांची खुलेआम लूट असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. आयोगाच्या सुनावणीत मुद्दा चर्चेला वीज गळतीच्या नावावर वितरण कंपनी ग्राहकांच्या लुटीचा मुद्दा २०१२ पासून लावून धरला आहे. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले होते. कारवाई न झाल्याने आंदोलनही केले होते. मागील वर्षी महावितरण वीज नियामक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन सुनावणीमध्ये माहितीही दिली होती. दि. ११-७-२०१६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाच्या सुनावणीत हा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. वीज चोरी हे अधिभार हेच मुख्य कारण आहे, असे रयत संघटनेचे अध्यक्ष राहूल कडू यांनी सांगितले. जुळ्या शहरासह तालुक्यात कित्येक ठिकाणी तारावर आकोडे टाकून वीज चोरी केली जाते. अधिभाराच्या नावाखाली शेतकऱ्याला त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. काही शेतातील विहिरीत पाणी नसल्याने ५ ते ६ वर्षांपासून बंद आहे. त्यांना अजूनही बिले येतात. शेवटी शेतकरीच नागवला जातो. इंधन समायोजन आकार हाही एकप्रकारचा अधिभारच आहे. - सोमेश ठाकरे (अध्यक्ष) मागच्या आठवड्यात चार ठिकाणी वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली. आमचे पथक गेले पण एकाच ठिकाणची वीज चोरी सापडली. सद्या वीज गळतीचा अधिभार लावला जात नाही. अचलपूर तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण नसल्यासारखे आहे. - जे. एच. वाघमारे, उपकार्यकारी अभियंता