शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:36 IST

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला.

ठळक मुद्देसर्वाधिक मताधिक्याचा विक्रमविरोधकांना प्रचारस्थळी पोहचवणारे डॉ. पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला. एवढेच नव्हे तर १९५२ व १९५७ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे नोंदविला गेला आहे.१९५७ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ७६४ मतदान झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १ लाख ५७ हजार ५२३ मते (६२.३२ टक्के) पडली होती. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात इतर पाच उमेदवार होते. यात डॉ. मशानकर यांना २६ हजार ५३१ (१०.४४ टक्के), अण्णा मडघे यांना २० हजार ८९८ (८.२६ टक्के), अडसड यांना २० हजार १४ (७.९१ टक्के), संघई यांना १७ हजार ३७९ (६.८९ टक्के), तर पोतदार यांना १० हजार ४१ (४.१२ टक्के) मते मिळाली होती.१९६२ ची लोकसभा निवडणूक जिंकून भाऊसाहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला हा नेता दिल्लीच्या राजकारणातही वरचढ होता. १९५२ ते १९५६ या काळात ते भारताचे पहिले कृषिमंत्री व १९५७ ते १९६२ पर्यंत सहकारमंत्री होते. १९६२ च्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न देण्याचा हितशत्रूंचा डावपेच मात्र यशस्वी ठरला. तथापि, पहिल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा विक्रम व डॉ. पंजाबराव देशमुखांचा सामाजिक कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे.

प्रचारासाठी एकच वाहनप्रचारकार्याचा एवढा तामझाम नव्हता. एकच वाहन प्रचाराला होते. ज्या भागात प्रचार असला, त्या भागातील कार्यकर्ते घेऊन प्रचार सभा घेण्यात येत होती. स्थानिक कार्यकर्तेच प्रचार करीत असत. अलीकडच्या काळात शक्तिप्रदर्शनासारखे काहीही त्यावेळी नव्हते. सभेला माणसे आणली जात नव्हती, तर स्वत:हून लोक येत असत. १९५२ ला देशातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर भाऊसाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या घटनेचे त्यांचे भाचे दिवंगत जानराव देशमुख (सोळंके) हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

विरोधकांना बसविले वाहनात१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रचारार्थ निघाले असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे वाहन वलगावनजीक पंक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन नियोजित प्रचार सभेला पोहचवून दिले. एवढ्या विशाल हृदयाचा व निर्मळ अंत:करणाचा नेता दुर्मीळच!

पत्नीऐवजी पक्षासाठी मते१९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, तर त्यांच्या पत्नी विमलाबाई विधानसभेसाठी अपक्ष उभ्या होत्या. दोन्ही निवडणुका त्यावेळी एकत्रच होत असत. भाऊसाहेब पत्नीच्या प्रचारसभेला गेले नाहीत वा त्यांच्यासाठी मतदारांकडे मते मागितल्याचे ऐकिवात नाही; उलट विधानसभेतही काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या, असे ते सांगायचे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक