शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:36 IST

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला.

ठळक मुद्देसर्वाधिक मताधिक्याचा विक्रमविरोधकांना प्रचारस्थळी पोहचवणारे डॉ. पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला. एवढेच नव्हे तर १९५२ व १९५७ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे नोंदविला गेला आहे.१९५७ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ७६४ मतदान झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १ लाख ५७ हजार ५२३ मते (६२.३२ टक्के) पडली होती. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात इतर पाच उमेदवार होते. यात डॉ. मशानकर यांना २६ हजार ५३१ (१०.४४ टक्के), अण्णा मडघे यांना २० हजार ८९८ (८.२६ टक्के), अडसड यांना २० हजार १४ (७.९१ टक्के), संघई यांना १७ हजार ३७९ (६.८९ टक्के), तर पोतदार यांना १० हजार ४१ (४.१२ टक्के) मते मिळाली होती.१९६२ ची लोकसभा निवडणूक जिंकून भाऊसाहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला हा नेता दिल्लीच्या राजकारणातही वरचढ होता. १९५२ ते १९५६ या काळात ते भारताचे पहिले कृषिमंत्री व १९५७ ते १९६२ पर्यंत सहकारमंत्री होते. १९६२ च्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न देण्याचा हितशत्रूंचा डावपेच मात्र यशस्वी ठरला. तथापि, पहिल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा विक्रम व डॉ. पंजाबराव देशमुखांचा सामाजिक कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे.

प्रचारासाठी एकच वाहनप्रचारकार्याचा एवढा तामझाम नव्हता. एकच वाहन प्रचाराला होते. ज्या भागात प्रचार असला, त्या भागातील कार्यकर्ते घेऊन प्रचार सभा घेण्यात येत होती. स्थानिक कार्यकर्तेच प्रचार करीत असत. अलीकडच्या काळात शक्तिप्रदर्शनासारखे काहीही त्यावेळी नव्हते. सभेला माणसे आणली जात नव्हती, तर स्वत:हून लोक येत असत. १९५२ ला देशातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर भाऊसाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या घटनेचे त्यांचे भाचे दिवंगत जानराव देशमुख (सोळंके) हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

विरोधकांना बसविले वाहनात१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रचारार्थ निघाले असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे वाहन वलगावनजीक पंक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन नियोजित प्रचार सभेला पोहचवून दिले. एवढ्या विशाल हृदयाचा व निर्मळ अंत:करणाचा नेता दुर्मीळच!

पत्नीऐवजी पक्षासाठी मते१९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, तर त्यांच्या पत्नी विमलाबाई विधानसभेसाठी अपक्ष उभ्या होत्या. दोन्ही निवडणुका त्यावेळी एकत्रच होत असत. भाऊसाहेब पत्नीच्या प्रचारसभेला गेले नाहीत वा त्यांच्यासाठी मतदारांकडे मते मागितल्याचे ऐकिवात नाही; उलट विधानसभेतही काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या, असे ते सांगायचे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक