शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:36 IST

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला.

ठळक मुद्देसर्वाधिक मताधिक्याचा विक्रमविरोधकांना प्रचारस्थळी पोहचवणारे डॉ. पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला. एवढेच नव्हे तर १९५२ व १९५७ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे नोंदविला गेला आहे.१९५७ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ७६४ मतदान झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १ लाख ५७ हजार ५२३ मते (६२.३२ टक्के) पडली होती. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात इतर पाच उमेदवार होते. यात डॉ. मशानकर यांना २६ हजार ५३१ (१०.४४ टक्के), अण्णा मडघे यांना २० हजार ८९८ (८.२६ टक्के), अडसड यांना २० हजार १४ (७.९१ टक्के), संघई यांना १७ हजार ३७९ (६.८९ टक्के), तर पोतदार यांना १० हजार ४१ (४.१२ टक्के) मते मिळाली होती.१९६२ ची लोकसभा निवडणूक जिंकून भाऊसाहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला हा नेता दिल्लीच्या राजकारणातही वरचढ होता. १९५२ ते १९५६ या काळात ते भारताचे पहिले कृषिमंत्री व १९५७ ते १९६२ पर्यंत सहकारमंत्री होते. १९६२ च्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न देण्याचा हितशत्रूंचा डावपेच मात्र यशस्वी ठरला. तथापि, पहिल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा विक्रम व डॉ. पंजाबराव देशमुखांचा सामाजिक कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे.

प्रचारासाठी एकच वाहनप्रचारकार्याचा एवढा तामझाम नव्हता. एकच वाहन प्रचाराला होते. ज्या भागात प्रचार असला, त्या भागातील कार्यकर्ते घेऊन प्रचार सभा घेण्यात येत होती. स्थानिक कार्यकर्तेच प्रचार करीत असत. अलीकडच्या काळात शक्तिप्रदर्शनासारखे काहीही त्यावेळी नव्हते. सभेला माणसे आणली जात नव्हती, तर स्वत:हून लोक येत असत. १९५२ ला देशातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर भाऊसाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या घटनेचे त्यांचे भाचे दिवंगत जानराव देशमुख (सोळंके) हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

विरोधकांना बसविले वाहनात१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रचारार्थ निघाले असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे वाहन वलगावनजीक पंक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन नियोजित प्रचार सभेला पोहचवून दिले. एवढ्या विशाल हृदयाचा व निर्मळ अंत:करणाचा नेता दुर्मीळच!

पत्नीऐवजी पक्षासाठी मते१९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, तर त्यांच्या पत्नी विमलाबाई विधानसभेसाठी अपक्ष उभ्या होत्या. दोन्ही निवडणुका त्यावेळी एकत्रच होत असत. भाऊसाहेब पत्नीच्या प्रचारसभेला गेले नाहीत वा त्यांच्यासाठी मतदारांकडे मते मागितल्याचे ऐकिवात नाही; उलट विधानसभेतही काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या, असे ते सांगायचे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक