शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

Lok Sabha Election 2019; निवडणूक विभाग जागला तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 1:33 AM

निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगालबोट नाही : प्रत्येक दिवस सतर्कतेचा, महिलांचेही उल्लेखनीय कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.लोकसभेच्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून सुरू असली तरी आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र मतदानाचे पूर्वसंध्यापासून ते इव्हीएम स्ट्रांग रूम येऊन सील करेपर्यंतचे तीन दिवस जिल्हा निवडणूक विभागासह एआरओ स्तरावर जणू परीक्षा घेणारेच ठरले आहेत. लोकशाहीच्या या महाकुभांत कुठेही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया निर्धोक व पारदर्शीपणे पार पडली. यामागे अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाºयांचे टिमवर्क महत्त्वाचे ठरले आहे.मतदानाचे साहित्य वाटपासून धावपळीला सुरूवात झाली. मतदानाचा दिवस यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतदारसंघातून ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रुममध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा निवडणूक विभागच तात्पुरत्या स्वरूपात येथे स्थलांतरित झाला व येथेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. विधानसभानिहाय ईव्हीएम या ठिकाणी ट्रकद्वारे आणण्यात आलेत. या मशीनची मोजणी, किती खराब झाले ते परत आलेत काय, याची पडताळणी, सर्व मशीनची बूथनिहाय मोजणी नंतर सर्व ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रूमध्ये जमा करण्यात आल्यात. यावेळी तगडा सुरक्षा बंदोबस्त या प्रक्रियेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांसह जिल्हा निवडणूक विभागाचे सर्व कर्मचाºयांचे जागरण होत आहे. मात्र, लोकशाहीच्या महोत्सवात कामाचा कुठलाही ताण येवू न देता सर्वजण तत्परतेणे काम करीत आहेत.एक दिवस हक्काची रजानिवडणूक प्रक्रियेत तीन दिवस दिवस-रात्र जे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर होते त्यांना शनिवारी हक्काची रजा राहणार आहे. वास्तविकता असा काही नियम नाही मात्र, असा प्रचलीतपणे सुरू आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी शनिवारी आराम करतील व पुन्हा नव्या जोशात कर्तव्यावर राहतील. मात्र या अवधीत महत्त्वाचे काम असल्यास कार्यलयातदेखील त्यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019