शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यवसाय मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

अमरावती : राज्यभरात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, अनेक क्षेत्रातील नागरिक तणावाखाली ...

अमरावती : राज्यभरात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, अनेक क्षेत्रातील नागरिक तणावाखाली जगत आहेत. गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाले. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षात आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.

ग्रामीण भागातील सुतार काम करणारे, वेल्डिंग व इतर मजुरीची कामे करणारे, म्हणजेच लोहारकाम, टेलर, वेल्डिंग, मोटार गॅरेज, कापड दुकानातील कामगार, चहा टपरी चालक, नास्ता विक्री करणारे, मडकी घडवणारे कुंभार बांधव, मंडप व्यवसाय, आचारी, सलूनचे काम करणारे, बाजारात जाऊन खेळणी, स्टेशनरी विकणारे, मेवामिठाई विकणारे असे प्रत्येक व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. त्यामुळे अक्षरश: या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने किमान ठराविक वेळेत तरी उघडली जातात. त्यामुळे त्यांना उपजीविकेला काही अडचण येत नाही. पण जे व्यवसाय आठवडी बाजार किंवा यात्रावर अवलंबून आहेत. त्यांना मात्र जगणे मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या विवाह समारंभावर मनाई आहे. यामुळे यावर आधारित उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात असे अनेक छोटे व्यवसाय कोरोना, लॉकडाऊनमुळे ही बंद आहे. अशा लोकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यावसायिकांना खरे तर शासनाने मदत करणे आवश्यक आहे. पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. फक्त बांधकाम कामगार व पीएमकिसानचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत. बाकी सर्वांना अडचणी निर्माण झाले आहेत.

बॉक्स

छोटे व्यावसायिक हतबल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे यात्रा, आठवडी बाजार बंद असल्याने छोटे व्यावसायिक अक्षरश: हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या पिकवलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.