शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लॉकडाऊनने बदलली लग्नाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

ठळक मुद्देशेकडो लग्न साध्या पद्धतीने : बडेजावाला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : लग्न समारंभ म्हटले म्हणजे अमुुक परिवारापेक्षा आपला थाट जादा हवा, अशी चढाओढ लागते. त्यांच्या मुलीच्या लग्नात जेवलेल्या वऱ्हाडापेक्षा आपल्या येथे जास्त लोक जेवले पाहिजे, हा प्रौढीचा मुद्दा झाला आहे. त्यातच धावपळ, मानसन्मान, रुसवे-फुगवे आले. लग्नकार्य पूर्ण होईपर्यंत वधुपिताच्या जिवाची धाकधूक सुरूच असते. कोरोनाने या सर्वांना फाटा देत अगदी मोजक्या लोकांमध्ये लग्नसमारंभ करण्याचा मंत्र दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.एरवी लग्न समारंभाच्या दिवशी गाजावाजाशिवाय वातावरणनिर्मिती होत नसल्याचा सूर असतो. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो साध्या पद्धतीचे विवाह सोहळे पार पडले आहेत. त्यामुळे लग्न लावणाऱ्या कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. कोणतेही वाद्य, घोडा, मंडप नाही. हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा, ध्वनिप्रदूषणही नाही. एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे, मानापमानाचे प्रसंग नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने वऱ्हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे.मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सध्या सर्वत्र अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत. यामध्ये वरपक्ष आणि वधुपक्षाकडचे लाखो रुपयांची बचत होत आहे. कोरोनाने जशी शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे.आदर्श घ्यावाचसध्या विवाहांना सुरुवात झाली असून, आता पुढे अशाच लग्नबाबत समाधान असू द्यावे, अशी अपेक्षा अनेक व्यक्ती व्यक्त करीत आहेत. साध्या पद्धतीने विवाह सोहळ्याची ही प्रथा अशीच चालू राहिली, तर शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणारी सर्वसाधारण कुटुंबे यापुढे लग्नासाठी झालेल्या अवाजवी खर्चातून कर्जबाजारी होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न