शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जलसंपदा विभागाच्या आवारात दारुच्या बॉटल्स जैसे- थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

अमरावती : येथील जलसंपदा विभागाच्या आवारात रात्री दरम्यान येथेच्छ दारू ढोेसून आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात. यासंदर्भात ...

अमरावती : येथील जलसंपदा विभागाच्या आवारात रात्री दरम्यान येथेच्छ दारू ढोेसून आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात. यासंदर्भात ‘जलसंपदा विभागाच्या आवारात तळीरामांची चंगळ असे वृत्त १५ ऑगस्टच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली. मात्र, परिसरातील दारूच्या रिकाम्या बॉटल्स उचलण्याची तसदी कुणीही घेतली नाही.

सोमवारी दारूच्या रिकाम्या बॉटल्स

येथील परिसरात दोन मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंता, तीन कार्यकारी अभियंता व अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची कार्यालय आहे. त्यामुळे दारूच्या बॉटल्स फेकल्या जात असेल तर आपल्या कार्यालयाचा काय संबंध, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात कोण दारू पितो? कुणी ओल्या पार्ट्या झोडून रिकाम्या बॉटल्स फेकल्या. हा प्रश्न जरी असला तरी स्वतंत्र दिनाला परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी कुठल्याच कार्यालयाने घेतली नाही, हे विशेष! याच ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचा तरी धाक अधिकाऱ्यांना असायला हवा. येथे १३ सुरक्षा रक्षक असून त्यांची प्रत्येक आठ तासाला चार जणांची ड्युटी असते. म्हणजे रात्रीला फक्त चार सुरक्षा रक्षक एवढ्या मोठ्या परिसराची सुरक्षा करतात. वसाहतीतील काही कर्मचारी येथे रात्री दारू पिऊन रिकाम्या बॉटल्स फेकून देत असावे, असा संशय सुरक्षा रक्षकांनी वर्तविला आहे. बाहेरील लोकांचा मुख्य प्रवेशव्दारातून वावर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या ठिकाणी अशाप्रकारचे मद्यपी दारू पीत असतील तर येथे राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे त्या परिसराची तातडीने स्वच्छता करून संबधितांवर सुरक्षा रक्षकांचा वॉच असावा, अशी मागणी होत आहे.

कोट

परिसरातील स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश मी कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. आवारात सुरक्षा रक्षक वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलले जातील.

- अनिल बहादुरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती