शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:08 IST

विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली.

ठळक मुद्देप्रबोधनाचा नवा अध्याय प्रारंभ

सुमित हरकुट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. यानिमित्ताने प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला गेला.गतवर्षीपासून यात्रेदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ६ ते १३ जानेवरीदरम्यान वारकºयांनी भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. रविवार ७ जानेवारीला ‘माऊलीचा रिंगण’ सोहळा येथे रंगला. यात्रेतील शंकर पटाच्या जागेवर दुपारी २ वाजता या रिंगण सोहळ्याकरिता तयार करण्यात आलेल्या पाच एकर जागेवर विठ्ठलाच्या वारीतील वाखरी येथे रिंगणात धावणारे कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे माऊलीचे अश्व बहिरम धावले. अश्वांनी तीन रिंगण पूर्ण केल्यावर पावलांना पावन झालेली माती भक्तांनी आपल्या भाळी लावताच बहिरमबुवाचा जयघोष आसमंतात पसरला.या रिंगण सोहळ्याला आळंदी येथील महाराजांच्या पादुका, भक्तीधाम येथील गुलाबराव महाराजांच्या पादुका, बहिरमबाबांच्या पादुका, गुणवंतबाबांच्या पादुकांच्या पालखी आणण्यात आल्या होत्या. या रिंगण सोहळ्या दरम्यान बहिरमबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी तसेच इतर पदाधिकारी, चांदूर बाजार उपसभापती नितीन टाकरखेडे उपस्थित होते.

बहिरम शंकराच्या कुळातील लोकदेवअमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या शिखरावर विराजमान बहिरमबुवा अनेकांचे कुलदैवत आहे. जागृत शक्तिपीठ, सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान, पौराणिक महात्म्य लाभलेले लोकदैवत असलेले बहिरमबुवा म्हणजे भैरवनाथ. भगवान शंकराच्या परिवारातील अष्टभैरवा पैकी एक लोकदेव म्हणून त्यांची ओळख आहे.

सर्वाधिक काळ चालणारी यात्राबहिरम येथील प्रसिद्ध यात्रा महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी आहे. २० डिसेंबरला विधिवत पूजनाने सुरू होणारी यात्रा २० जानेवारीला समाप्त होते, तर ३१ जानेवारीपर्यंत ती पुरते. पूर्वी दोन वेळा व दहा दिवस भरणारी यात्रा आता वर्षातून एकदाच मात्र महिनाभर असते. तिथीवर भरणारी यात्रा आता तारखेवर आली आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक