शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:08 IST

विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली.

ठळक मुद्देप्रबोधनाचा नवा अध्याय प्रारंभ

सुमित हरकुट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. यानिमित्ताने प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला गेला.गतवर्षीपासून यात्रेदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ६ ते १३ जानेवरीदरम्यान वारकºयांनी भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. रविवार ७ जानेवारीला ‘माऊलीचा रिंगण’ सोहळा येथे रंगला. यात्रेतील शंकर पटाच्या जागेवर दुपारी २ वाजता या रिंगण सोहळ्याकरिता तयार करण्यात आलेल्या पाच एकर जागेवर विठ्ठलाच्या वारीतील वाखरी येथे रिंगणात धावणारे कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे माऊलीचे अश्व बहिरम धावले. अश्वांनी तीन रिंगण पूर्ण केल्यावर पावलांना पावन झालेली माती भक्तांनी आपल्या भाळी लावताच बहिरमबुवाचा जयघोष आसमंतात पसरला.या रिंगण सोहळ्याला आळंदी येथील महाराजांच्या पादुका, भक्तीधाम येथील गुलाबराव महाराजांच्या पादुका, बहिरमबाबांच्या पादुका, गुणवंतबाबांच्या पादुकांच्या पालखी आणण्यात आल्या होत्या. या रिंगण सोहळ्या दरम्यान बहिरमबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी तसेच इतर पदाधिकारी, चांदूर बाजार उपसभापती नितीन टाकरखेडे उपस्थित होते.

बहिरम शंकराच्या कुळातील लोकदेवअमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या शिखरावर विराजमान बहिरमबुवा अनेकांचे कुलदैवत आहे. जागृत शक्तिपीठ, सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान, पौराणिक महात्म्य लाभलेले लोकदैवत असलेले बहिरमबुवा म्हणजे भैरवनाथ. भगवान शंकराच्या परिवारातील अष्टभैरवा पैकी एक लोकदेव म्हणून त्यांची ओळख आहे.

सर्वाधिक काळ चालणारी यात्राबहिरम येथील प्रसिद्ध यात्रा महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी आहे. २० डिसेंबरला विधिवत पूजनाने सुरू होणारी यात्रा २० जानेवारीला समाप्त होते, तर ३१ जानेवारीपर्यंत ती पुरते. पूर्वी दोन वेळा व दहा दिवस भरणारी यात्रा आता वर्षातून एकदाच मात्र महिनाभर असते. तिथीवर भरणारी यात्रा आता तारखेवर आली आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक