शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

युरिया, डीएपीसोबत लिकिंगचा फंडा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 7, 2024 23:40 IST

महिनाभरावर खरीप : नको असलेले जोडखत मारणार शेतकऱ्यांच्या माथी.

अमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने बाजारात बियाणे, खतांची तयारी सुरू झाली आहे. यावेळी युरिया, डीएपी १०:२६:२६ या रासायनिक खतांसोबत कंपन्यांनी विक्रेत्यांवर जोडखतांचा (लिकिंग) मारा सुरू केला आहे. पर्यायाने विक्रेत्यांद्वारा हे खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खत कंपन्यांद्वारा युरिया, डीएपी व १०:२६:२६ या खतांसोबत २०:२०:०:१३ किंवा सल्फर या जोडखताचा पर्याय ठेवला आहे. १० टनासोबत ५ ते १० टन जोडखत दिले जात असल्याची माहिती एका कृषी केंद्रचालकाने दिली. या जोडखताला फारसा उठाव नसल्याने विकेत्यांद्वारा साठवणूक किंवा शेतकऱ्यांना विकावे लागणार आहे. त्यामुळे नको असलेले जोडखत पर्यायाने शेतकऱ्यांनाच विकले जाणार आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, लिकिंगबाबत अद्याप विक्रेत्यांची तक्रार प्राप्त नाही. याबाबत कंपन्यांना पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यापूर्वी रोहिणीमध्ये शेतकरी पेरणीपूर्वी मशागत करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांची लगबग वाढते. यावर्षी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामानविषयक संस्थांनी दिलेला आहे. बियाणे बाजारात विक्रेत्यांची तयारी सुरू झाली आहे, शिवाय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी खरीप हंगामपूर्व आढावा घेतलेला आहे.-----------------------हंगामात विक्रेत्यांना जोडखतांचा पर्याय देऊ नये, यासाठी संबंधित कंपन्यांना पत्र दिलेले आहे. शिवाय निविष्ठा विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनीदेखील जोडखत शेतकऱ्यांना विकू नये, यासाठी सूचना केल्या आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी------------------------रासायनिक खतांची सद्यस्थिती (मे.टन)युरिया :१२,७९९एसएसपी : १२,४१६डीएपी : ६५७४एमओपी : २२५५संयुक्त खते : २६,६०६-----------------------सद्यस्थितीत ६०,६५० मे.टन साठा उपलब्ध१) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २,६३,२७० मे. टन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यातुलनेत १,३८,४०० मे. टनाचे आवंटन आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आलेले आहे.२) रब्बी हंगामातील ५१,७२७ मे. टन खत मार्चअखेर शिल्लक आहे. दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत ८,९२३ मे. टन खतांचा पुरवठा झाल्याने सद्यस्थितीत ६०,६५० मे. टन साठा उपलब्ध आहे.------------------------वेळेवर पुरवठा नसल्यास वाढणार शाॅर्टेजआयुक्तालयाने १,३८,४०० मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर केलेले आहे. मात्र त्यातुलनेत पेरणीकाळात व त्यानंतर नियमित पुरवठा न झाल्यास युरिया, डीएपी, एमओपीसह अन्य खतांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील हा प्रकार झाला होता. त्यावेळी बफर स्टॉकमधून (संरक्षित साठा) पुरवठा करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती